अधिकार.. मानवाला मिळालेले अधिकार. काही अधिकार हे आपल्याला जन्मापासुन मिळालेल असतात, काही घटनेने दिलेले आहेत. व्यक्त होण्याचे अधिकार, नाकारण्याचे अधिकार, स्वीकारण्याचे अधिकार, बोलण्याचे अधिकार, व्यवहाराचे अधिकार, देण्याचे अधिकार, घेण्याचे अधिकार, कामगारांचे अधिकार, शेतकऱ्यांचे अधिकार, महिलांचे अधिकार, मुलांचे अधिकार… अधिकाराची ही जंत्री वाढतच जाणार आहे. […]
एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांची ज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपत पडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणारा आपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे. […]
निवडणुका येतात, निवडणुका जातात ! राजकीय पक्षांची ध्येयधोरणे, भूमिका ठरलेल्या असल्या तरी त्या भूमिका वठविणारे कलाकार आपल्या दिशा सतत बदलवत राहतात. यंदाही नियमानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापल्या भूमिका घेऊन लोकांसमोर येत आहेत. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना स्वतःवर खूप अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊन टोप्या बदलाव्या तसे पक्ष बदलत आहेत. त्यामुळे सध्याच्या वातावरणात “निष्ठा” नावाची गोष्ट उरली नाही. […]
प्रत्येक निवडणुकीला इथला नागरिक मतदान करत असतो परंतु तो मतदान नव्हे तर मताधिकार बजावत असतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. संविधानिक तरतुदीनुसार हा मताचा अधिकार इथल्या प्रत्यक नागरिकाला दिला आहे .आणि ते दुसऱ्याला दान म्हणून देने हे थोडे अयोग्य वाटते कारण सर्वसाधारण पणे आपण आपले अधिकार कधी दान केले असे वास्तवात कोणतेच चित्रण अद्याप दिसलेलं नाही किंवा दिसणार ही नाही. […]
सध्याच्या युगात “व्यक्तिगत संवाद” खूपच कमी झालेला आहे. दुसऱ्याजवळ आपला विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी आवश्यकता असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीमुळेच आपल्या विचारांना नवी दिशा व नवा आयाम मिळतो. […]
स्मरण म्हणजे आठवण…एखादया गोष्टीचे चिन्तन…..बालपणापासुन खुप अश्या आठवणी आपण मनात जपलेल्या असतात. लहानाचे मोठे होई पर्यंत लहान सहान गोष्टी समोर येतात आणि खुप सार्या गोष्टी स्मरण करुन देतात. […]
सध्याच्या निवडणूकीत भाजपावर एक आरोप सतत होत आहे की भाजपा ३७० विषयावर प्रचार करतोय. ३७० चा आणि महाराष्ट्राचा काय संबंध?? “तुम्ही केलेल्या कामावर बोला”, “विकासाच्या मुद्यावर बोला”, “तुम्ही पुन्हा निवडणून आल्यावर काय करणार यावर बोला” अशा अनेक गोष्टी विरोधक आणि काही पत्रकारांकडून उपस्थित होत आहेत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ३७० आणि महाराष्ट्राचा संबंध […]
मी हे करु शकते, मला हे जमेलच किंवा हे असच घडेल, अशी अंतर्मनातुन येणारी शाश्वती म्हणजेच आपल्या आतुन येणारा आवाज….आपल्या अंतर्मनातल आत्मविश्वास….क्रूती घडवण्याआधी निकालासाठी रचलेला सकारात्मक द्रुष्टिकोन…….म्हणजेच आत्मविश्वास. […]
प्रमाण, लिखित भाषा वेगळी आणि बोली भाषा वेगळी. आपलीच बोली शुद्ध आणि त्यांची (म्हणजे नक्की कोणा कोणाची आणि कुठली कुठली) अशुद्ध, हे असं कसं ? नुकसान, नुसकान कीं लुस्कान ? चिकटवणे कीं चिटकवणे ? बादली कीं बालदी ? यांतलं शुद्ध अशुद्ध आपण कोण ठरवणार ? आपल्याला तो अधिकार आहे कां ? […]
एकाग्रतेने मनाची स्थिरता वाढते आणि स्थिरता वाढल्यामुळे मन एकचित्त होउन हाती घेतलेल्या कार्यामध्ये आपले आपसुकच चिंतन वाढते आणि जेव्हा चिंतन वाढते तेव्हा नैसर्गिकरित्या आपाल्याला खुप सार्या वेगवेगळ्या कल्पना आपोआपच सुचतात. ज्यामुळे कामाची गती वाढते, त्या कामामध्ये कोणतीही अडचण येत नाही. आणि हाती घेतलेले काम खुप सुंदर पद्धतीने पार पाडले जाते. ही जी एकाग्रता आहे ती प्रत्ये़कामध्ये […]