मला त्या सद्गृहस्थाचे आभार मानायचे पण भान राहिले नाही. सुटकेच्या आनंदाने मी भराभर घराकडे निघालो. पण क्षणभर थांबून मागे पाहतो तर काय, तिथे कोणीच नव्हते. आसपास माणसाचा मागमूसही नव्हता. मग कोण होता तो? देवच तर नसेल? खरंच आज मला देव भेटला होता व त्याने मला जीवदान दिले. मनोमन मी त्या अज्ञात देवाचे आभार मानले व मार्गस्थ झालो. […]
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे म्हणतात ते उगाचच नाही. लहानपणी मला गोष्टींचे पुस्तक वाचण्याचे वेड होते. इसापनितीच्या कथा वाचून वाचून पाठ झाल्या होत्या. दहा वर्षांची असताना स्वयंपाकघरातील तांबड्या कोब्यावर मी ‘कविता’ लिहिली होती. तो कोबा म्हणजे माझी ‘पाटी’ असायची. मोठ्ठाली गणिते त्यावर मी सोडवित असे. […]
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला श्रीराम पचिंद्रे यांचा लेख स्वदेशी हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा मंत्र होता. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने युवा विनायक दामोदर सावरकरांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशीचा झेंडा उचलला होता. १९१५ मध्ये महात्मा गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन झाले. १९२० मध्ये टिळकांचा मृत्यू झाला, त्या दरम्यान […]
खरेच छान दिवस होते बालपणीचे, पोषक वातावरणही त्या जोडीला मला लाभले. मौजमस्ती, गमती जमती याला मिळालेली भरभक्कम अशी चांगल्या संस्कारांची मजबूत पायरी. अशा सर्व जमेच्या बाजू असणाऱ्या बऱ्याच आठवणी या लिखाणाच्या निमित्ताने एकेक करून समोर दिसू लागल्या. […]
माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, मला बरेचदा व्यवसायाच्या संदर्भात ट्रेनिंग प्रोग्राम अथवा इतर सामाजिक कार्यक्रमांत तरुणाई बरोबर संवाद साधण्याचा योग येतो. मलादेखील अशा संवादाच्या प्रसंगाची ओढ असते. कारण ही तरुणाई काय विचार करते, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, अडचणी काय आहेत आणि भविष्याबद्दलच्या त्यांच्या आकांक्षा काय आहेत ह्याचा वेध ह्या निमित्ताने मला घेता येतो. गेल्या सुमारे चार दशकांच्या काळात […]
कष्ट हीच तर ती शक्ती आहे. जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते. व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये प्रा. गजानन नेरकर यांनी लिहिलेला लेख. […]
भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अशी घोषणा देऊन भारताचे तेज, भारताचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि स्वाभाविकच सर्वांचेच लक्ष भारताची ओळख, भारताची संस्कृती जगात पोहोचवणाऱ्या पर्यटन या क्षेत्राकडे वळले. त्याही क्षेत्रात आपण आत्मनिर्भर कसे होऊ शकतो याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न. […]
लेखक क्रिकेटपटु आहेत मुंबईच्या १५ वर्षांखालील संघापासून २५ वर्षांपर्यंतच्या टीमचे कर्णधारपद त्यांनी भूषवले असून रणजी संघाचेही प्रतिनिधित्वही केले आहे. त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंट ह्या विषयात एमबीए. केले असून Tendulkar Middlesex Sports Academy (TMGA) चे क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर तसेच प्रशिक्षक आहेत. सध्या डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी इथे व्हेन्यू मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. […]
माझा जन्म जळगावचा. मात्र माझे सारे बालपण आणि शालेय शिक्षण जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या तालुक्याच्या ठिकाणी झाले. माझे वडील पेशाने डॉक्टर होते. तरी गावात नर्सरी, पोल्ट्री, फिशरी, गाई-म्हशींचा गोठा व्यावसायिक उपक्रम त्यांनी चालवून पाहिले. बालपणीचा काळ विविध अनुभवांनी समृद्ध ठरला. […]