हे काम सुद्धा भाजपा सरकारनेच केले आहे. या सरकार मध्ये सुद्धा काही कट्टर पंथीय आहेत. पण त्यांचा विरोध जुगारून जर हि कामे होत असतील तर मी या सरकारचे मना पासून अभिनंदन करतोय. अजूनही लोकांना धर्माची खऱ्या अर्थाने जाणीव करून देण्याची गरज आहे. भाजपा सरकारने ती करावी हीच अपेक्षा आहे. […]
आयुष्य हे खर तर मला एखाद्या खवळलेल्या समुद्रा प्रमाणे वाटते.एका पाठोपाठ लाटा या येतच राहतात. अनेकदा या लाटांच्या माऱ्यापुढे मन खिन्न होऊन जाते.अगदी थकल्या सारखे होते. पण अशाच वेळी आठवण होते ती कुसुमाग्रजांच्या ‘कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेची. अगदी भीषण वादळात सापडला असतानाही किती खंबीर,धीरगंभीर वाटतो तो आणि त्याचे ते वागणे पाहून वाटते आपण उगाचच छोट्या छोट्या […]
‘सुधारक’कार आगरकरांचे ‘शिष्य’ ‘तुतारी’कार केशवसुत आपल्या ‘तुतारी’या कवितेत सांगतात- “जुने जाऊ द्या मरणालागुनि जाळूनी किंवा पुरुनी टाका सडत न एका ठायी ठाका सावध ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवूनी” असा एल्गार करणारा संदेश त्यांनी नव्या पिढीला दिला.जुन्या गोष्टींना कवटाळून न बसता काळाचे भान ठेवून तरुणांनी नवे विचार आत्मसात करावेत,असे त्यांनी सांगितले. क्रांतीकारी कवी ज्ञानपीठ विजेते […]
शहद जीने का मिला करता हैं थोडा थोडा जानेवालो के लिये दिल नही तोड़ा करते आपल्यापैकी अनेकांनी ही गझल ऐकली असेल.जीवनाचे तत्त्वज्ञान सहज सोप्या साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे यात.यातील शब्द फक्त प्रियकर/प्रेयसी(मितवा) साठी नाही.थोडे बारकाई ने पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की ही गोष्ट जीवनात प्रत्येक ठिकाणी लागू पडते. जे हातचे गमावले त्याबद्दल माणसाला हुरहुर […]
मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला आणि मुठा नदीत तो फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे. राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. संभाजी ब्रिगेडने याआधी दादाजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. […]
भारतात सुद्धा एक शेक्सपिअर जन्माला आला होता आणि त्यांचे नाव – राम गणेश गडकरी ! पण मला हे ‘भेटले’ ते ‘भेटले’ अशी अशुद्ध भाषा बोलणारी पैदास मोठ्या संख्येने वैचारिक गोंधळ घालत आहेत. त्यांना त्यांचे काय महत्व कळणार. यांच्या पैकी किती जणांनी गडकरींचे वाङ्मय वाचले आहे. गडकरींची हि कविता फक्त वाचावी आणि साहित्य संमेलनात फक्त हजार मतदानात निवडून आलेल्यांनी आपण कुठे बसतोय याचे आत्मशोधन करावे. […]
गेले काही दिवस माझ्या मनात ‘विश्वास’ या विषयावर विचार येत होते. खरच विश्वास ठेवावा का कोणावर? कि ठेवूच नये? एखाद्यासाठी आपण जीवाला जीव द्यायला तयार होतो तो विश्वासानेच कि आपल्यावर तशी वेळ आली कि ‘तो एखादा’ तसेच वागेल या अपेक्षेने..? अशासारख्या अनेक प्रश्नांनी मनात गुंता झला होता..असे प्रश्न निर्माण होण्याला माझ्या काही जवळच्यांची प्रत्यक्ष पाहिलेली तशीच […]
शरीर हे क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर ‘ अवयव दान ‘ करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा […]
खांदेकरी शिव्या देणार नाहीत तिरडी उचलताना , इतपत वजन मर्यादित ठेवावे , सरणावर ठेवताच जळायला मदत व्हावी म्हणून थोडी चरबीही असायला हरकत नाही अंगात . पूर्णपणे जळून झाल्यावर उरणारी दोन – अडीच किलो वजनाची हाडे काही काळाने पंचमहाभूतांत विलीन होऊन जाणार आहेत , त्यामुळे मेल्यावर आपले काही मागे राहील , या भ्रमात राहण्याचा मूर्खपणा करू […]