नवीन लेखन...

महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील पर्यटनस्थळांचा परिचय – वाचकांच्या नजरेतून…

गंगेच्या उगमपाशी – गोमुख – भाग ३

मग येते गंगोत्री! येथील मुख्य आकर्षण म्हणजे ‘गंगेचे मंदिर.’ गंगेच्या मूळ मंदिराचा जिर्णोद्धार अमरसिंह थापा या नेपाळच्या गुरखा जनरलने केला. मात्र सध्याचे गंगेचे मंदिर जयपूर राजघराण्याने बांधले. त्यावर सोन्याचा कळस चढवला. गंगामातेला सुवर्णछत्र अर्पण केले. पांढऱ्या ग्रेनाईटने बांधलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून गाभारा व सभामंडप अशी त्याची रचना आहे. गाभाऱ्यात गंगा, यमुना व सरस्वतीच्या मूर्ती असून […]

गंगेच्या उगमपाशी गोमुख – भाग २

गंगा ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. सर्व पुराणात गंगेचे महात्म्य वर्णन आहे. स्कंदपुराणात——— तद्तत् परमं ब्रह्म द्रव रूप महेश्वरि । गंगारूपं यत् पुण्यतमं पृथिव्यामागतं शिवे ।। म्हणजे गंगा नावाचा द्रवरूप प्रवाह म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. महापातकीचाही उद्धार करण्यासाठी स्वयं कृपाळू परमेश्वराने पुण्यजलाच्या रूपात पृथ्वीवर अवतार धारण केला आहे, अशा शब्दात गंगेची महती सांगितली आहे. […]

गंगेच्या उगमापाशी- गोमुख -भाग १

प्राचीनकाळी इक्ष्वाकु वंशातील महापराक्रमी, प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करणारा पुण्यशील चक्रवर्ती सगर राजा राज्य करत होता. या सगर राजाला साठ हजार पुत्र होते व ते सर्वजण आपल्या पित्याप्रमाणेच पराक्रमी होते. एके दिवशी सगर राजाला अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली. त्याने ऋषीमुनींचा सल्ला घेतला. सर्वांनाच ही कल्पना आवडली. यज्ञाची सिद्धता झाली. अश्वमेध यज्ञाचा घोडा सिद्ध झाला. […]

गढवालमधील पंचप्रयाग

केदारनाथहून येणारी, निळ्या रंगामुळे खुलणारी, शांत वाहणारी मंदाकिनी तर बद्रीनाथहून आदळत, आपटत खळाळत धावणारी अलकनंदा यांचे संगमस्थान म्हणजे ‘रूद्रप्रयाग’. या स्थानाचे उल्लेख स्कंदपुराण तसेच महाभारतात आले आहेत. श्रीशंकर पार्वतीमातेला सांगतात, “हे देवी, माझे तिसरे निवासस्थान रूद्रालय या नावाने प्रसिद्ध आहे. ते सर्व तीर्थांत उत्तम तीर्थ आहे. या स्थानाच्या स्मरणानेसुद्धा व्यक्ती सर्व पापातून मुक्त होते. […]

पूर्णागिरी

पूर्णागिरी टणकपूरपासून २०-२१ कि.मी. अंतरावर आहे. दिल्लीहून टणकपूरसाठी बससेवा उपलब्ध आहे. साधारण ३३० कि.मी. चे हे अंतर असून या प्रवासाला ९-१० तास लागतात. मोरादाबाद, रूद्रपूर-खतीमा असा हा मार्ग आहे. लखनौ, नैनीतालहूनही टणकपूरला जाता येते. टणकपूर हे बऱ्यापैकी मोठे गाव असून सर्व प्रवासी सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. पायथ्याशी असलेल्या या गावाचे मूळ नाव ‘ब्रह्मदेव.’ […]

रूद्रनाथ आणि कल्पेश्वर

‘कल्पेश्वर’ पंचकेदारमधील पाचवा आणि शेवटचा केदार! (उंची २१३४ मी.) दुर्वास ऋषींनी या स्थळी कल्पवृक्षाच्या छायेत तपश्चर्या केली होती. दानवांच्या जाचाला त्रासून देवदेवतांनी या ठिकाणी भगवान विष्णूची आराधना केली. भगवान विष्णू आपल्या चतुर्भूज रूपात प्रकट झाले आणि त्यांनी सर्वांना अभय दिलं आणि सांगितलं की, ‘शिव संहारक आहे आणि तेच दानवाचा संहार करतील.’ […]

सर्वाधिक उंचीवर ‘तुंगनाथ’

पावले तुंगनाथची वाट चालू लागतात. साधारण १ कि.मी. अंतर चालल्यावर वृक्षवल्ली आपल्याला एका सुरेख हिरव्या कुरणावर आणून सोडतात व आपला निरोप घेतात. अशा कुरणाला ‘बुग्याल’ असे म्हणतात. या पुढच्या प्रवासात मात्र कुठेही झाडे दिसत नाहीत. वातावरणात होणारा सुखद बदल स्पष्ट जाणवत असतो. समोर सोनेरी तेजाने झळकणारी पर्वतशिखरे उभी असतात. […]

मध्यमहेश्वर

हिमालय हा भारताच्या सांस्कृतिक भावजीवनातील एक अनन्यसाधारण विभुती आहे. भारताची सस्यशामल भूमी समृद्ध करणाऱ्या पवित्र नद्यांचा हिमालयात उगम झाला आहे. परंपरेने भगवान शंकराचे हिमालयाशी नाते जोडले आहे. अशा शंकरानी आपल्या कायम वास्तव्यासाठी हिमालयाची निवड केली. पुराणांनी शंकराचे हिमालयाशी आलेले कोमल संबंध आल्हादाने उलगडून दाखवले आहेत. अनेक देव-देवतांचे क्रीडास्थान, निवासस्थान म्हणून हिमालय पुराण प्रसिद्ध आहे. कालिदासाने आपल्या […]

हिमशिखरांच्या सान्निध्यातलं केदारनाथ

चैत्र महिना उजाडतो. आकाश निळ्या रंगाने झळकू लागते. आसमंतात सोनशिंपण पसरते. सूर्यकिरणांचे नाजूक हात पर्वतशिखरे गोंजारू लागतात. बर्फाची चादर हलकेच दूर होऊ लागते. नव्या नवलाईचे दिवस सुरू होतात. खुलणारा निसर्ग हसरा होऊ लागतो. […]

पाताळ भुवनेश्वर

ही स्कंदपुराणाच्या मानसखंडातील कथा आहे. त्रेता युगात सूर्यकुलोत्पन्न चक्रवर्ती राजा ऋतुपर्ण अयोध्येवर राज्य करीत होता. एके दिवशी नल राजा आपली पत्नी दमयंती हिच्याबरोबर सारीपाट खेळत असताना खेळात हरला. शरमलेला नल राजा आपला मित्र राजा ऋतुपर्ण याच्याकडे आला व एखाद्या अज्ञात स्थळी आपल्याला लपवून ठेवण्याची ऋतुपर्ण राजाला विनंती करू लागला. ऋतुपर्ण राजा नल राजाला घेऊन हिमालयातील एका […]

1 8 9 10 11 12 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..