शिवलीलामृत, स्तोत्ररत्नकार, गुरुचरित्र यासारख्या ग्रंथातून या ज्योतिर्लिंगाचा महिमा वर्णिलेला आहे. इतकेच नव्हे तर श्री ज्ञानेश्वर, श्री समर्थ रामदास, श्रीधर स्वामी व संत नामदेवांनीही या शिवतिर्थाचा उल्लेख केला आहे. […]
वांद्रे पूर्व हा तसा गर्दी आणि दाटीवाटीच्या वस्तीमुळे गजबजलेला भाग. कारण याच भागात महत्वाची कार्यालयं, कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि न्यायालय वसली आहेत. या अति महत्वपूर्ण ठिकाणांपैकी आपण कुठेही जाणार असाल किंवा पूर्वेला जर काही कामा निमित्त आले असाल तर इथल्या गणेश मंदिराला अवश्य भेट द्या; […]
स्त्री जातीचा मुकुटमणीं महासती मान मिळोनी धन्य झाली जीवनीं पतीव्रता सावित्री ।।१।। ब्रह्मा लिखित अटळ ह्या सूत्रीं केला बदल हे तिच्या तपाचे फळ सावित्रीने मिळविले ।।२।। जरी येतां काळ चुकवावी वेळ बदलेल फळ हेच दाखविले तीने ।।३।। समजण्या धर्म पतिव्रता ऐकावी सावित्री कथा मनीं भाव भरुनी येतां आदर वाटे तिच्या परीं ।।४।। मद्रदेशाचा नृपति नांव तयाचे […]
प्रत्येक घराचे जसे कुदैवत – कुलस्वामिनी, तसंच शहराची, नगराची, गावाची सुद्धा एखादी जागृत देवता ही असतेच ज्याला ग्रामदेवता असंही म्हणतात. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाची एकतरी ग्रामदेवी ही असतेच. […]
आंजर्ले गाव रत्नागिरी जिल्हयात समुद्रकाठी उत्तर अक्षांश “१७-४२ वर आणि पूर्व रेखांश ७३-८” वर वसले आहे. आंजर्ल्यास येण्यासाठी मुंबई-आंबेत-मंडणगड-कांदिवली-आंजर्ले असा रस्ता आहे.या रस्त्याला थेट मंदिरापर्यंत पोहचणारा जोड रस्ता आहे. पुणे कोल्हापूर, कराड ही गांवे दापोलीला महामार्गाने जोडलेली आहेत. दापोली-आसूद-आंजर्ले असा दुसरा मार्ग आहे. […]
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल जवळ असलेल्या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्हणून प्रसिध्द आहे. येथे दर चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. “पद्म” म्हणजे कमळ आणि “आलय” म्हणजे घर यावरून या ठिकाणाचे वैशिष्ट्य लक्षात येते. […]
कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीज किंवा यम द्वितीया असे म्हणतात. या दिवशी यमराज आपली बहिण यमुना हिचे घरी भोजनाला गेला. यास्तव या दिवसाला यम द्वितीया हे नांव पडले. […]