नवीन लेखन...

राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन

काश्मिरी विद्यार्थ्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा एक योग्य निर्णय

काश्मिरी विद्यार्थ्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा आणि कारवाई योग्य की अयोग्य यावर वाद सुरू आहे. पाकिस्तानच्या विरोधात जेव्हा सामना असतो, तेव्हा निव्वळ खेळाचा विचार होत नाही; कारण पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे. या दोन देशांमध्ये फाळणीचे कटू वास्तव आहे. 
[…]

सरकारकडून ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेच्या नावावर संरक्षण दलांची फसवणूक

`लष्करी जवानांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील आहे. माजी सैनिकांसाठी सरकारने `वन रँक, वन  पेन्शन’ ही योजना सुरू केली. मात्र अद्याप या योजनेची अंमलबजावणी सरकारने केली नाही. या योजनेची अंमलबजावणी न करता सरकारने जवानांच्या भावनांशी खेळ  केला आहे,’ 
[…]

झिनजिआंग, येथील “स्वातंत्र्य चळवळ” चीनचे मर्मस्थान

पाकिस्तानव्याप्त काश्मिरला लागून असलेल्या चीनच्या सीमेवर झिनजिआंग हा प्रांत ,चीनचा सर्वांत संवेदनशील भाग मानला जातो. आठ देशांच्या सीमा या भागाशी जोडल्या गेल्या आहेत. या प्रांतात ४१ टक्के लोकसंख्या उईगूर समुदायाची असून ४० टक्के लोक हंन जमातीचे आहेत. स्वतंत्र राज्याची मागणी करीत अल-कायदाशी लागेबांधे असलेल्या इस्ट तुर्कस्तान इस्लामी चळवळ (इटीआयएम) संघटनेच्या कारवायांनी चीनच्या झिजीयांग प्रांतात धुमाकूळ घातला आहे. 
[…]

भारत, चीन आणि नेपाळमधील सत्तांतर

नेपाळ हा भारताचा अगदी निकट शेजारी, जगातील एकमेव हिंदूराष्ट्र म्हणून भारतात त्या देशाबद्दल आपुलकी वाटे, परंतु काही वर्षापूर्वी तेथे आलेल्या माओवादी  राजवटीने ‘हिंदू राष्ट्र’ही नेपाळची प्रतिमा पुसून टाकून हिंदू हा तेथील अधिकृत अथवा राष्ट्रीय धर्म नसल्याचे घोषित केले. गिरीजाप्रसाद कोईरालांसारख्या पुढार्‍याच्या कारकीर्दीत नेपाळबरोबर भारताचे जसे संबंध होते.
[…]

तर समुद्रातील ‘कारगिल’ला सामोरे जावे लागेल!

दर महिन्याला किमान दोन ते तीनवेळा चिनी सैन्याने भारतात घुसखोरी करणे ही नेहमीच बाब झाली आहे.प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चिनी सैनिक अनेकदा लडाखमध्ये भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या भागातच वारंवार घुसखोरी करते आणि त्यावर आपले प्रेमळ सरकार फक्त चर्चा करुन त्यांना परत जाण्यास सांगतात. 
[…]

बनावट नोटांचा सुळसुळाट पाकिस्तान / चीन कडुन एक नवीन प्रकरचा दहशतवाद

सध्या १२ लाख कोटी रुपयांचे बनावट चलन भारतीय अर्थव्यवस्थेत घुसले असल्याचा एक अंदाज आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार, बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून चार लाख बनावट नोटा उघडकीस आल्या. २०००-२००१ मध्ये दहा लाखांत तीन बनावट नोटा, असे प्रमाण होते, ते दहा लाखांत आठ इतके वाढले आहे. 
[…]

काश्मीर, दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबींवर आप पार्टीची ठोस भूमिका जरुरी

जम्मू-काश्मीरमधील लष्कर हटवण्याची मागणी पाकिस्तानने वारंवार केलेली आहे. पाकिस्तानला काश्मीरमध्ये धुडगूस घालायचा आहे, परंतु जोपर्यंत तिथे लष्कर आहे तोपर्यंत त्यांना काही करता येत नाही. त्यामुळे ज्या-ज्या वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चर्चा झाली त्या प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या नेत्यांनी काश्मीरमधील लष्कर हटवण्याची मागणी पुढे केली.
[…]

प्रशांत भूषण यांची काश्मीरातील लष्कर हटविण्याची देशद्रोही मागणी

ज्या आम आदमी पक्षाचे ते नेते आहेत त्या पक्षाचे हे धोरण आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘आप’ने आतापर्यंत कधीच आपले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा काश्मीरविषयीचे धोरण जाहीर केलेले नाही. भूषण यांनी दहशतवाद्यांना अनुकूल अशी भूमिका घेणे, हे कुणालाच आवडलेले नाही. शेवटी केजरीवाल यांनी खुलासा केला, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे.
[…]

“आप”ली माध्यमे

आप बद्दल माध्यमांनी चालवलेला एकतर्फी   प्रचार यावर प्रकाश टाकण्याचा  एक प्रयत्न… सध्या आपल्याकडे सगळ्याच वृत्तवाहिन्यानवर अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, आणि त्यांची पार्टी आप एवढी एकाच बातमी चालू आहे. आपल्या माध्यमांना आप ने इतकी भूल घातलीये कि, माध्यमे हे साफ विसरून गेलीयेत देशात दुसर्याही घटना घडतायत, आणि या आप वाल्यानाही माध्यमात, चर्चेत कसे राहायचे हे कळून […]

1 28 29 30 31 32 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..