भारताच्या आंतरिक आणि बाह्य सीमा सुरक्षित नाहीत, अशी कितीही ओरड केली, त्याबाबत कितीही निवेदने दिलीत, निदर्शने केलीत अथवा मोर्चे काढले, तरी सरकार काही त्याची दखल घेण्यास तयार नाही. सीमेवर थातूरमातूर इलाज करून सरकार तेथे शांतता प्रस्थापित करू इच्छिते. […]
देशाची सुरक्षा दोन प्रकारची असु शकते.बाह्य सुरक्षा म्हणजे सिमेवरची सुरक्षा आणी अंतर्गत सुरक्षा म्हणजे देशाच्या आतील सुरक्षा.बाह्य सुरक्षेमध्ये चीन, पाकिस्तान पासून असलेला धोका महत्वाचा आहे. या विषयावर संरक्षणतज्ज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे सविस्तर भाष्य दृक-श्राव्य (ऑडिओ – व्हिज्युअल्स) माध्यमातून सादर केले आहे. […]
आपल्या देशात काय चालले आहे? टुंडा अथवा यासिन भटकळ यांना झालेली अटक, त्यांनी दिलेल्या कबुल्या, त्यातून पाकिस्तानविरुद्ध पुरावे हे सारे प्रसार माध्यमांचा टिआरपी वाढवण्यासाठी ठीक आहे, पण दहशतवादाचा कर्करोग त्यातून संपणार नाही. दहशतवादविरोधी लढाई लांब पल्ल्याचे युद्ध आहे. यासिन भटकळ आणि ‘टुंडा’ यांना अटक हे सुरक्षा यंत्रणेचे यश नक्कीच प्रशंसनीय आहे. […]
आपल्या देशात काय चालले आहे? काश्मीरमधील पूंछ या सीमावर्ती भागात पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार चालु आहे. भारताने शस्त्रसंधी तोडल्याचा आव आणून त्याचा निषेध करणारा ठराव पाकिस्तानी संसदेमध्ये संमत झाला. १६ ऑगस्टला तब्बल १० वर्षांनंतर पाकिस्तानी सैन्याकडून कारगिल व द्रास भागामध्ये शस्त्रसंधीचा भंग केला. […]
जम्मू-कश्मीर पुन्हा एकदा पेटले आहे. किंबहुना जम्मू-कश्मीरातील पाकिस्तान समर्थक आणि फ़ुटीरवादीनी ही आग लावली आहे. फरक इतकाच की, एरव्ही कश्मीर खोरे हिंसाचाराने धुमसत असते. यावेळी जम्मू आणि आसपासच्या हिंदूबहुल जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. सर्वप्रथम किश्तवाड हे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. […]
हिंसाचार्यांशी लढताना बळी जाणार्या पोलिसांचे, हिंसाचार्यांनी ज्यांचे प्राण घेतले त्या निरपराध नागरिकांचे मानवधिकार आहेत का? हिंसाचारापासून दूर व सुरक्षित असलेल्या विचारवंतांची आणि कायद्याचा कीस काढून अशा हिंसेचा न्याय करायला बसलेल्या तटस्थ न्यायमूर्तींची याबाबत काही जबाबदारी असते की नाही? […]
बिहारमधील सारन जिल्ह्यात मंगळवारी (१६ जुलै) एका शाळेत खिचडीमधून झालेल्या विषबाधेने संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी सारन जिल्हात बंद पुकारला. संतप्त नागरिकांनी तीन पोलिसांच्या गाडयासह एका गाडीची तोडफोड केली. […]
अफगाणिस्तानात अमेरिकेने हस्तक्षेप केला त्याला अकरा वर्षे झाली. अलीकडच्या काळात अमेरिकेला सर्वाधिक काळापर्यंत गुंतवून ठेवणारे हे युद्ध ठरले. अगदी व्हिएतनामचे युद्धदेखील यापेक्षा कमी काळ चालले होते आणि त्यात झालेला खर्चदेखील अफगाणिस्तानच्या युद्धापेक्षा कमी होता. […]
देशाच्या सुरक्षिततेला सर्वाधिक धोका नक्षलवाद्यांकडून असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी म्हणूनच म्हटले आहे. मात्र, नक्षलवादाचा हा प्रश्न सोडविण्याचा मुद्दा त्यांनी बहुधा, निवडणुकीनंतर येणार्या पुढील सरकारवर सोडला असावा.छत्तीसगडमध्ये नक्षलवादाचा पुरता बीमोड करण्यासाठी तेथे ऑपरेशन ‘ग्रीन हंट’ पुन्हा नव्या जोमाने राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. […]
भारत भेटी नंतर चिनी पंतप्रधान आता पाकिस्तान भेटीवर आहेत.चीनच्या दक्षिण आशियातील परराष्ट्र धोरणात पाकिस्तानची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. चीन-पाकिस्तानसोबतची अतूट मैत्री भारताने मान्य करावी. केवळ नवी दिल्लीची मर्जी राखण्यासाठी पाकिस्तानसोबतच्या संबंधात बाधा येणार नाही, असा इशारा चीनने दिला आहे. […]