नवीन लेखन...

जीवन परिघ

एक परिघ आंखले ,  विधात्याने विश्वाभोवतीं, जीवन फिरते ,  त्याचे वरती ।।१।।   वाहण्याची क्रिया चाले,  युगानुयुगें ह्या जगतीं, कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा,  एकांच परिघात फिरती ।।२।।   जेंव्हां कुणीतरी थकून जाई  दुजा उठोनी मदत करी, जीवन मरणाची शर्यत  जिंकण्यासाठीं लक्ष्य धरी ।।३।।   मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी  नियंत्रित करी जगाला, परिघ सोडूनी जाण्यासाठीं  दिसत […]

पंख फुटता !

ते जातील उडूनी पंख फुटता   पाहत राहशील, डोळे भरुनी । आजवरी जे प्रेम दिले तू   शक्ती त्याची उरी बाळगुनी  ।।१   माया, वेडी कशी असे बघ   वाटते तुजला तुझीच पिले ती । हसून, खेळून बागड्तील  सदैव तुझ्या पदारा खालती ।।२   जेंव्हा पडले पाउल पहिले   आधाराविण तुझ्या अंगणी नांदी होती दूर जाण्याची   तुजपासुनी त्याच क्षणी ।   परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला   मायेचा तो पडदा असता । टिपून घेशी अश्रू आज ते   परिस्थितीची जाणीव होता ।।   डॉ. […]

 ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी,  ज्ञानेश्वर राजा  । दु:खी होऊनी हळहळली,  विश्वामधली प्रजा  ।। १ सम्राट होता बालक असूनी,  राज्य मनावरी  । हृदय जिंकले सर्व जणांचे,  लिहून ज्ञानेश्वरी  ।। २ आसनीं बसत ध्यान लावता,  समाधिस्त झाले  । बाह्य जगाचे तोडून बंधन,  प्राण आंत रोकले  ।। ३ निश्चिष्ठ झाला देह जरी ,  बाह्यांगी दर्शनी  । जागृत आसती प्राण तयांचे,   […]

आज आहे रक्षाबंधन

— कवी – कुशल डरंगे आम्ही साहित्यिक ग्रुपमधून मी सदैव जपतो आज सार आठवतो ताई तुझं प्रेम साठवतो रक्षण करण्यास हात पुढे करतो आज आहे रक्षाबंधन भरून आले हे नंदन बहीण भावाचे हे स्पंदन नात्यात फुलवी सुगंधी चंदन बहिणीने बांधली राखी आज भावाच्या हातावर उजळला साज या बंधनात नसते कसले व्याज नाही उमगले या नात्याचे राज […]

प्रिय बहीण

— कवी : तुळजाप्रसाद धानोरकर आम्ही साहित्यिक प्रिय बहीण, तुझं आणि माझं नातं तसंच आहे, जसं रेशीमबंध तु आज बांधलेस, घट्ट,थोडंस सैल,आणि आपुलकीचं… —————————————— ◆आज मुद्दाम लिहावच लागलं… —————————————– आपलं हे नातं कधी बेगडी होऊ देऊ नकोस इतकंच… तुझ्या सुखात पुढे पुढे करणारे जर तुझ्या दुःखात दडून बसले तर तु समजून घे कि त्या नात्याला फार […]

 मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी

मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला  ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला  ।।३।। वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत  ।।४।। वाईट घटना घडते त्यास भोग […]

दुष्टपणा

दगड टाकतां पाण्यावरी,  तरंगे त्याची दिसून आली  । दगड होई स्थीर तळाशी,  बराच वेळ लाट राहीली…१,   जेव्हा कुणीतरी क्रोध करी,  वातावरण दूषित होते  । क्रोध जातो त्वरीत निघूनी,  दूषितपणा कांहीं काळ राहते…२,   निर्मळपणा दिसून येई,  स्थिर होवून जातां जल  । पुनरपि पडता खडा क्रोधाचा,  सारे होवून जाते गढूळ…३,   स्थिर होण्यास वेळ लागतो,  गढूळ […]

भावनेस हसती विचार

भावनेच्या जावूनी आहारीं,  नुकसान करतात सारे, तर्कशुद्धता विसरून जाते,  अंगात भरूनी वेडे वारे ..१, भावनेची लाटच उठता,  मती होते एकदम गुंग, बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२ आपले सारे खरे असावे,  हाच होत असे अट्टाहास, आपण केल्या कर्मावरच,  बसतो आपला विश्वास..३ इंद्रीय आणि भावना यांची,  जमुनी जात असतां जोडी तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते […]

 संकोचलेले मन

मध्य रात्र झाली होती,  सारे होते शांत  । रस्त्यावरती तुरळक व्यक्ती,  वाटला एकांत  ।। एक गाडी मंदिरीं थांबली,  त्याच शांत वेळीं  । सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी  ।। सारे होते नशिबात त्याच्या,  धन संपत्तीचे सुख  । दिवस घालवी मग्न राहूनी,  कार्ये पुढती अनेक  ।। तर्कज्ञान  तीव्र असूनी,  आगळा बाह्य चेहरा  । परि अंर्तमन सांगत […]

आधुनिकता

नवलाईचे विश्व सारे,  नवलाईतच जगते  । आगळ्याच्या शोधामध्यें,   नव-नवीन इच्छीते  ।।   ताजे वाटते आज जें,   शिळे होई उद्यांच ते  । प्रवाही असूनी जीवन,   बदल घडवीत जाते  ।।   मुल्यमापन बदलांचे,   संस्कारावरी अवलंबूनी  । परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें,  विचार फिरे क्षणोंक्षणीं  ।।   मुळतत्व ते राही कायम,   आकार घेई जसा विचार  । ताजा शिळा भाव मग तो,   ठरविला […]

1 125 126 127 128 129 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..