मुंबईचे शांघाय करण्याआधी !
आज सरकार मुंबईचे शांघाय करण्याचा घाट घालीत आहे पण मुंबईत राहणाऱ्या काही नागरिकांच्या व सतत येणाऱ्या लोंढ्यांच्या नसानसात भिनलेला अस्वच्छतेचा निचरा कोण करणार? नागरिकांच्या मानसिकतेवर रत्यांची तसेच सार्वजनीक वाहानांची व ठिकाणांची स्वच्छता अवलंबून असते. स्वतंत्र भारताचे मंत्री, पुढारी व सुजाण नागरिक देशाच्या प्रमुख कार्यक्रमांच्या वेळेस सार्वजनीक ठिकाणी स्वच्छता राखण्याच्या आणि कश्याकश्याच्या शपथा घेतात. समारंभ झाल्याझाल्या मंत्रीच रस्त्याच्या बाजूला पण तंबाखू किंवा गुटख्याची पिचकारी मारून शपथेला हरताळ फसताना आपण बघतो. निवडणुकींच्या वेळी शपथेवर दिलेली आश्वासने जशी सोईस्कररीत्या विसरली जातात तसेच हे. “गरज सरो आणि वैद्य मरो”.
[…]