नवीन लेखन...

संबंध ठेवायला अडचण येते?

ज्यांना आपला पुरुषी अहंकार कुरवाळत बसायची सवय असते; त्यांच्याकडे पश्चात्ताप करण्यावाचून फार काही शिल्लक राहत नाही हे सत्य कायम लक्षात ठेवावे. […]

आहारातील बदल – शाकाहार भाग १५

जे आपले नाही, त्याला आपले म्हणण्याचा अट्टाहास भारतीय संस्कृतीमधे नाही. जे आपले आहे, त्यावरील हक्क सोडू नये. जे आपले नाही, त्यावर आपला हक्क गाजवू नये. आणि जे मुळात आपले नाही, त्याला ओढून ताणून आपले का म्हणा ? एका गावातील एका पारावर एक बाहेर गावचा साधू येऊन बसला होता. अचानक त्याचे लक्ष रस्त्यावर पडलेल्या एका सोन्याच्या नाण्याकडे […]

आहारातील बदल-शाकाहार भाग १४

गहू खायचा नाहीतर तांदुळ ! एखाद्या गोष्टीची इतकी सवय होते, की नंतर सोडताना खूप त्रास होतो. गहू बंद केला तर कल्पना सुद्धा करवत नाही. मग डब्यात काय देणार ? यांना काय सांगायला जातेय, आम्हाला वेळच नाही, आता एवढ्या वर्षात काही झालं नाही, आता काय होणारे ? नुसतं हॅवाॅक आहे झालं !! सुशिक्षित, विचार करणाऱ्या सुगृहिणीकडून अश्या […]

आहारातील बदल-शाकाहार भाग १३

सगळं चाललंय ते टीचभर पोटासाठी. काय शाकाहार, काय मांसाहार काय असेल ते खाऊन घ्या गपचुप. शेवटी पोट भरण्याशी मतलब ना ! सगळं खरं आहे, पण जी बुद्धी नावाची चीज दिली आहे ती कशासाठी ? त्याचा वापर कधी करणार ? हिंदु भारतीय संस्कृती प्रमाणे या बुद्धीचा वापर आपले आयुष्य शतायुषी होण्यासाठी करायचा आहे. त्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढवायची […]

अभ्यंगस्नान

आज नरकचतुर्दशी. या दिवशी अंगाला तेल-उटणे लावून मग अंघोळ करण्याची पद्धत आहे. यालाच ‘पहिली अंघोळ’ असंही म्हटलं जातं. ‘पहिली’ अंघोळ असं म्हणण्यामागे काय कारण असेल बरं? कारण असं आहे की; या दिवसापासून रोज नित्यनेमाने अभ्यंग करायचा आहे. याकरता ‘पहिली’. आपण मात्र वर्षातला पहिला आणि शेवटचा अभ्यंग एकाच दिवशी करत असतो!! अभ्यंग: संपूर्ण अंगाला कोमट तेल लावणे […]

आहारातील बदल-शाकाहार भाग १२

आता काय करू? कोकणात गहू वापरायचा नाही तर आता काय करू ? आता गहू खायची एवढी सवय (सात्म्यता) झाली आहे आता काय करू ? गहू सोडता येणार नाही. आता काय करू ? सुखाची एवढी सवय झाली आहे आता काय करू? जसा प्रदेश, तसा आहार जसा आहार, तशी शरीरयष्टी जशी शरीरयष्टी, तसे काम जसे काम, तसा आहार. […]

आहारातील बदल-शाकाहार भाग ११

जिथून समुद्र फक्त पन्नाससाठ किमी च्या अंतरावर आहे, तिथे तांदुळ हे मुख्य अन्न आहे, हे कदापि विसरून चालणार नाही. जरी ग्रंथामधे गोधूम म्हणजे गहू, प्रमेह म्हणजे प्रचलीत नावानुसार साखरेच्या आजारात, सांगितला गेला असला तरी, प्रदेश विचारानुसार आणि गुणधर्मांचा विचार करून, गहू अपथ्य (म्हणजे खाऊ नये ), म्हणून सांगायला सुरवात केल्यावर रूग्णांच्या लक्षणामधे खूप फरक पडलेला, मी […]

आहारातील बदल-शाकाहार भाग १०

गव्हाचा सर्वात जास्त वापर पंजाब हरयाणा मधे होतो. हरियाणाला तर गव्हाचे कोठारच म्हणतात. या राज्यांमधे गव्हाचा अतिवापर व्हायला लागला आणि पंजाबी जाट लोकांचे कोलेस्टेरॉल वाढू लागले असे संशोधन सोलापूरचे सुप्रसिद्ध वैद्य बागेवाडीकर शास्त्रींनी आपल्या एका व्याख्यानात सांगितले होते. आणि ते खरेही वाटते. धर्मेंद्रचे आहाराचे डायलॉग कसे होते ? “मक्के की रोटी, सरसोंका साग, बैगन का भरता […]

आहारातील बदल-शाकाहार भाग ९

रोटी आणि चपाती यांच्यात आणखी काही फरक आहेत. भाकरीचे पीठ भिजवताना त्यात तेल घालावे लागत नाही कारण ते हाताला चिकटतंच नाही. जिथे चिकटपणा जास्त तिथे चिकटपणा कमी करण्यासाठी आपण तेल वापरत असतो. चपातीचे पीठ (म्हणजे कणिक) मळताना, मात्र त्यात तेल घालावे लागते. म्हणजे ते हाताला चिकटत नाही. तेल घालून देखील कणिक हाताला चिकटतेच. एवढा चिकटपणा या […]

आहारातील बदल-शाकाहार भाग ८

शाकाहारी जेवणामधे प्रमुख घटक कोणता? भात किंवा भाकरी. प्रदेशानुसार ठरते भाकरी किंवा पोळी ते. ज्या प्रदेशात तांदुळ हे पिक असते, तेथील आहारात भात हा मध्यवर्ती असतो. बाजुला पोळी असते. आणि जिथे तांदुळ हे मुख्य पिक नाही, तिथे भात मुख्य नाही. तो नंतर वाढून घेतला जातो. पहिल्या वाढीला भाकरी किंवा रोटी आली तर ती मध्यवर्ती आहार ठरते. […]

1 43 44 45 46 47 56
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..