नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

आम्र वृक्षाचे पौराणिक व धार्मिक महत्व

आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे असे वर्णन आहे. बुद्ध चरित्रात गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत होते याच्या कथा आहेत. […]

ऋषि पंचमी

भाद्रपद शुद्ध पंचमीचे दिवशी स्त्रियांनी करावयाचे व्रत. यात सप्तऋषिंची व अरुंधतीची पूजा करण्यास सांगितले आहे. […]

श्रीगणेश चतुर्थी

भाद्रपद शुद्ध चतुर्थी रोजी गणेश चतुर्थी व्रत केले जाते. हे व्रत, उत्सव जवळपास संपूर्ण भारतात करतात. याला वरद चतुर्थी असेही नांव आहे.
[…]

हरितालिका तृतीया

भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. या व्रतामध्ये शिवपार्वतीचे पूजन केले जाते. […]

वराह जयंती

विष्णूंचा तिसरा अवतार वराह होय. याची जयंती भाद्रपद शुद्ध तृतीयेला असते. हा अवतार हिरण्याक्ष नावाच्या असुराला मारण्यासाठी झाला असे उल्लेख आढळतात. याचे दुसरे नांव यज्ञवराह असेही आहे. […]

पोळा

हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील अमावस्येला केला जातो. यालाच बेंदूर असेही नांव आहे. देशपरत्वे काही ठिकाणी आषाढ, भाद्रपद अमावस्येला हा सण केला जातो. पेरण्या संपलेल्या असतात, शेतीच्या कामातून बैल रिकामे झालेले असतात. अशा वेळी बैलांना न्हाऊ- माखू घालतात. आरती ओवाळतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. दुपारी त्यांना सजवून गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढतात. यात […]

गोपाळ काला

श्रीकृष्ण जयंतीचे दुसरे दिवशी हा साजरा केला जातो. याला काला, दही-हंडी अशीही नांवे आहेत. श्रीकृष्णांनी व्रजमंडलात गायी चरविताना सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केले. या कथेला अनुसरुन हा काला व दही हंडी फोडण्याची प्रथा सुरु झाली असावी. सध्या याला काही ठिकाणी विकृत स्वरूप येत आहे. कोणत्याही रंगाच्या हंड्या बांधतात, त्या फोडतात. […]

श्रीकृष्ण जयंती

श्रावण कृष्ण अष्टमीला विष्णूंचा आठवा अवतार भगवान कृष्णांचा जन्म झाला. यांचा जन्म मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर, बुधवारी मथुरेत बंदीशाळेत (कारागृहात) झाला. या निमित्ताने हे व्रत करण्याची प्रथा आहे. सप्तमीचे दिवशी एकभुक्त राहून, अष्टमीला व्रताचा संकल्प करून, पूजेच्या जागेवर फुले, पाने, वेली यांनी वातावरण सुशोभित करतात. तेथेच सूतिका गृह तयार करतात. पूजेच्या चौरंगावर देवकी, श्रीकृष्ण यांची स्थापना करतात. […]

वरदलक्ष्मी व्रत

श्रावण मासातील शुक्लपक्षातील शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी व्रत केले जाते. कलशावर वरदलक्ष्मी स्थापन करून श्रीसूक्ताने देवीची पूजा करतात. २१ अनरश्यांचा नैवेद्य अर्पण करतात. या व्रताचे फळ व्याधीनाश असे आहे. दक्षिण भारतातदेखील हे व्रत आषाढ महिन्यातील शुक्लपक्षातील अखेरच्या शुक्रवारी करण्याची रीत आहे. -श्री करंदीकर गुरुजी

हयग्रीवोत्पत्ति

श्रावण पौर्णिमेला भगवान विष्णूंच्या हयग्रीव अवताराची उत्पत्ति झाली. हयग्रीवाच्या उत्पत्तिबद्दल निरनिराळ्या कथा आढळतात. याची मूर्ती कशी असावी याबद्दल पांचरात्रात सांगितले आहे. चार हातांचा, तीन हातात शंख, अक्षमाला, व चौथा हात व्याख्यान मध्ये. याच्या मूर्ती कर्नाटकांत नुग्गेहळ्ळी येथे आहेत. मूर्ती उभी, अष्टभुजा, पायाखाली राक्षसाला तुडवणारी आहे तर दुसरी चतुर्भुज, विश्वपद्मावर बसलेली आहे. -श्री करंदीकर गुरुजी

1 5 6 7 8 9 70
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..