नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

वसुबारस

आज ‘वसुबारस’. पारंपारीक दिवाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाली..वसुबारस म्हणजे गाय-वासराच्या पुजेचा दिवस..ज्या गो-धनाच्या मदतीने शेतीतून धान्य पिकवले गेले, त्या गोधनाची कृतज्ञता म्हणून, तीची तीच्या वासरासहीत पुजा करण्याचा आज दिवस..गाय हिन्दू धर्मात अत्यंत पूजनीय आहे, त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे तीच्यापासून उत्पन्न झालेल्या बैलांशिवाय शेती अशक्य..! तीच्याप्रती कृतज्ञता म्हणूनच कृषीसंस्कृतीतील दिवाळी या सर्वात महत्वाच्या सणाची सुरूवात […]

गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस

आश्विन कृष्ण द्वादशीला गोवत्स द्वादशी म्हणतात. यालाच ‘वसुबारस ‘ असे नांव आहे. समुद्रमंथनातून पाच कामधेनू निर्माण झाल्या. त्यातील नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. या दिवशी स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी सवत्स धेनूचे पूजन करतात. तिची प्रार्थना करतात. हे सर्वात्मिके आणि सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझी मनोकामना सफल कर. गोडधोड करून तिला खाऊ […]

अभ्यंग स्नान.. आरोग्याला वरदान

दिवाळीच्या मंगलमयी पहाटेला अभ्यंग स्नान करतात हे सर्वश्रुत आहे. परंतु आज हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः उरकला जातो. अंगभर तेल लावून घेण्याची ना कुणाला आवड असते ना सवड. त्यामुळे रुढीच्या नावाखाली डोक्यावर तेलाची दोन बोटे टेकवली, अंगाला उटणे चोपडले अन् वरुन फसफस एखादा सुगंधित साबण घासला की झाले दिवाळी चे अभ्यंग स्नान. खरे तर प्रत्येकाने स्वास्थ […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ११ – परिशिष्टे

परिशिष्ट – (१) फुलपाखरू आणि संस्कृत (व इतर भाषा ) [ ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ या शीर्षकाच्या प्रा.शेषराव मोरे यांच्या लोकसत्तामधील लेखावरील, श्री. किशोर मांदळे यांच्या प्रतिक्रियेतील एक मुद्दा ]   ‘संस्कृतमध्ये फुलपाखराला शब्द नाहीं’ असें दुर्गा भागवत यांनी म्हटल्याचें सांगून मांदळे यांनी संस्कृतवर टीका केलेली आहे.  (पहा लेखाचा भाग -६ ). ‘संस्कृतमध्ये फुलपाखराला स्वतंत्र  शब्द […]

मन की बात – कोजागिरी

देशात झालेला शिक्षणप्रसार, त्यातही इंग्रजीचा पगडा, सुलभ ट्रॅंव्हेलींग, पाश्चिमात्य जीवनशैलीचा प्रभाव आणि तीचे अनुकरण करण्याचा आपला आंधळा प्रयत्न, जीवनाच्या सर्वच अंगांचे यांत्रिकीकरण करण्याचा हट्ट यामुळे आपल्या संस्कृतीतले मनाला आणि शरीराला पवित्र करणारे कितीतरी सण/प्रथा विकृत होत चालल्यात, लोप पावत चालल्यात..! कोजागीरी ही त्यापैकी एक.. कोजागीरी साजरी करण्यामागची पवित्र ‘अंधश्रद्ध’ कधीच लोप पावली आणि दुधाची जागा दारूने […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – १०/११

सारांश , आणि निष्कर्ष : आपण शेषराव मोरे यांच्या लेखातील मुद्यांवर, तसेच त्यावरील प्रतिक्रियांबद्दलही चर्चा केली, खंडनमंडन केलें, कांहीं माहिती दिली, कांहीं नवीन मुद्दे मांडले .  त्या सर्वाचा सारांश, आणि कांहीं निष्कर्ष,  आतां थोडक्यात पाहूं या. (पण त्यापूर्वी एक स्पष्टीकरण : माझें स्वत:चें मिडलस्कूलपासूनचें शिक्षण इंग्लिश-मीडियम-पब्लिक-स्कूलमध्ये झालेलें आहे ; व पुढील, इंजिनियरिंग, मॅनेजमेंट वगैरे सर्व शिक्षणही […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ९/११

संस्कृतचें ऐक्यासाठी योगदान : शेषराव मोरे यांच्या लेखाचें हेंच शीर्षक आहे, त्याअर्थी, तसें योगदान वास्तवात आहे, असें त्यांचें मत असल्याचें स्पष्ट आहे. मी या बाबतीत मोरे यांच्याशी सहमत आहे. गेल्या कांहीं सहस्त्रकांचा भारताचा इतिहास पाहिला तर, भारताच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या काळात भिन्नभिन्न राजवटी होत्या. इ.स च्या आधीची कांहीं व इ.स.च्या सुरुवातीची कांहीं शतकें भारताच्या कांहीं भागात […]

सोने लुटण्याच्या प्रथेमागची कथा

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून लुटण्याविषयी काही कथा आहेत. त्यावरून ही प्रथा कशी अस्तित्वात आली असावी यावर उजेड पडतो. रामायणाच्या पंचम सर्गांत रघुवंशामध्ये दिलेली कथा अशी- पूर्वी पैठणमध्येदेवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स नावाचा मुलगा होता. तो सुशील होता. मौजीबंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वरतंतू ऋषीच्या घरी विद्यार्जनासाठी गेला. काही काळ लोटल्यावर कौत्स सर्व शास्त्रांत पारंगत […]

संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – ८-ब/११

‘आजच्या जगात भौतिक व्यवहारासाठी संस्कृतचा कांहींही उपयोग नाहीं’ ( इति शिरवळकर) – हा मुद्दा आपण आधीच हाताळला आहे. आंतरराष्ट्रीत कीर्तीचे ज्येष्ठ विद्वान (कै.) दिनेश माहुलकरांचा अनुभव व त्याचें कथन काय सांगतें, तें आपण पाहिलें आहे. अन्य उदाहरणेंही पाहिली आहेत. त्यामुळे, यावर अधिक लिहिण्याची जरूर नाहीं. *(ज्यांना प्रा. माहुलकरांची माहिती नसेल , त्यांनी सरोजिनी वैद्य या, महाराष्ट्र […]

महाराष्ट्रातील तिसरे शक्तिपीठ – श्री रेणुकामाता माहूरगड

महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल ‘ अमलीवन ‘ म्हणून प्रसिद्ध होते .माहूर हे प्राचीन किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता, दत्तात्रेय, अनसूयामाता या तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा माहूरचा हा डोंगरकिल्ला गौंड या आदिवासी राज्याचा एकेकाळी सत्तेचे केंद होता. या परिसराला सुमारे ६ मैल तटबंदी आहे, किल्ल्यावर हत्तीदरवाजा, ब्रह्माकुंड, कारंजी, […]

1 51 52 53 54 55 70
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..