नवीन लेखन...

बाजार

उभी कोपऱ्यात शहराच्या,
ती वस्ती लाल दिव्याची.
अभिशाप भोगत असते,
रात्रीच्या अभिसाराची.
सकाळ होई दुसऱ्या प्रहरा,
शीण कायेचा तो सारा.
अंमल वारुणीचा असे अजूनही,
वस्त्रांचे भान ते नसे जराही.
झटकुनी दुखऱ्या देहाला कोनी,
कवळिती तयांना छातीशी धरूनी.
बिलगती कुस मिळे मायेची,
कसर रात्रभराच्या विरहाची.
स्नान करूनी हात जोडुनी,
देवाला सजविती फुलांनी.
करेल काय?निराकार तो ही,
चुरगळा फुलांचा पहात राही.
दिवस सरतो, सांज उगवते,
वस्तीची लगबग आता वाढते.
माय संपली मादी सजली,
पान्ह्यास दुरावती सानुली.
रांगोटी झाली माळून गजरा,
लपून गेला भकास चेहरा.
अधर रंगले तांबुल विड्यानी,
नटली वस्ती गिऱ्हाईकानी.
एक – दोन – तीन – चार,
वासनेने भरलेला बाजार.
मन मेलेला शृंगार कुणाशी,
व्यवहार रोकडा शेजेशी.
सरते रात्र अशीच एक ती,
निपचित होतसे सारी वस्ती.
उरते एक कुडी थकलेली,
खपाटल्या पोटाची भुकेली.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..