नवीन लेखन...

‘बाल’श्रीमंत’!!

बालपणी प्रत्येक मुलाला किंवा मुलीला घरी आलेल्या पाहुण्यांकडून हमखास एकच प्रश्न विचारला जात असे…
‘मोठं होऊन तुला काय बनायचं आहे?’ तेव्हा फुशारकीनं उत्तर दिलं जायचं… मला डाॅक्टर बनायचंय, मला वकील बनायचंय, मला इंजिनिअर बनायचंय… या आलटून पालटून तीन पर्यायाशिवाय उत्तरच नसायचं… कुणी मला शिक्षक किंवा कलाकार बनायचंय, असं म्हणायचं नाही…
बालपण भरभर संपतं… सभोवतालचं जग कळायला लागतं.. शिक्षण पूर्ण होतं, नोकरी लागते, लग्न होतं, कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडते, मुलं होतात, त्यांचं शिक्षण, त्यांची लग्नं होतात, नातवंड होतात…
तेव्हा लहानपणी विचारलेला प्रश्न आठवतो… ‘मोठं होऊन तुला काय बनायचंय?’.. आता त्यांना ठणकावून सांगावसं वाटतं की, ‘मला पुन्हा एकदा ‘लहान’ व्हायचं आहे!!!’
पण ज्यांनी हा प्रश्न विचारला होता ते तर कधीच देवाघरी गेलेले असतात… आणि आपल्याला एकटं पडल्याची जाणीव होते….
खरंच, लहानपण आनंदाचं असतं.. कशाचीही काळजी नसते.. काळजी घेणारे कायमच जवळपास असतात.. आपल्या आवडी निवडी जपल्या जातात.. हट्ट केला की, हवी ती वस्तू, गोष्ट मिळते.. आजारपणात काळजी घेतली जाते.. चांगली गोष्ट केली तर शाबासकी मिळते.. चुकलं तर ताकीद दिली जाते.. औत्सुक्याने विचारलेल्या प्रश्नांना समजेल अशा भाषेत उत्तरं मिळतात…
वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत कोऱ्या पाटीवर, संस्कार घोटून घोटून गिरवले जातात.. हे वय षडरिपूंपासून कोसों दूर असतं.. वयाच्या चौदाव्या वर्षापासून सभोवतालच्या निरीक्षणाची नोंद मेंदूत होऊ लागते.. कोण कसं वागतं, कसं बोलतं, कसं रहातं हे नव्याने कळू लागतं..
वाचनातून, बातम्यांतून, चित्रपटांतून चांगलं, वाईट कळायला लागतं.. संयम असेल, संस्कार असतील तर जीवन यशस्वी होतं.. संगत वाईट असेल तर व्यसनामुळे जीवनच बरबाद होतं…
तेव्हा आयुष्यातील लहानपणीचा काळ हा सर्वोत्तम असतो.. तो पुन्हा कधीही मिळत नाही..

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४
१४-११-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..