नवीन लेखन...
Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ८ – सावरकरांची चिंतानात्मक वृत्ती

सावरकरांच्या अनेक पैलू पैकी आणखी एक पैलू म्हणजे त्यांचे लेखन.  १९३७ साली सरकारने सावरकरांची पूर्ण मुक्तता केल्यावर १९३८ मधील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सावरकर निवडले गेले. एक राजकारणी,क्रांतिकारक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडले जाण्याची ही पहिलीच वेळ. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ७ – सावरकरांची लेखणी

सावरकरांच्या अनेक पैलू पैकी आणखी एक पैलू म्हणजे त्यांचे लेखन.  १९३७ साली सरकारने सावरकरांची पूर्ण मुक्तता केल्यावर १९३८ मधील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सावरकर निवडले गेले. एक राजकारणी, क्रांतिकारक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडले जाण्याची ही पहिलीच वेळ. सावरकर वयाच्या ११ व्या वर्षापासून लिखाण करीत होते. लहानपणाचा काळ यात त्यांनी फटके, पोवाडे, लिहिले. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ६ – सावरकरांची कर्तव्यनिष्ठा

देशसेवेच व्रत सावरकरांनी वयाच्या १६व्या वर्षीच शपथेवर घेतले. त्यांची मीमांसा करताना ते सांगतात. ”चापेकरांचे कार्य पुढे कोणीतरी चालवायला हवे मग ते मी का चालवू नये? इतरानाही ते कार्य करावेसे वाटत असे पण काही कारणास्तव ते करू शकत नव्हते मग मीच ते का करू नये?” देशाचा झेंडा पुढे नेता यावा म्हणून क्रांतिकारकांच्या  मार्गातील काटे साफ करायला कुणी तरी सेपार्स एंड मायानर्स हवे असतात ते कार्य आपलेच समजून आम्ही पुढे सरसावलो” […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ५ – सावरकरांची कृतज्ञता

१९३७ मध्ये सावरकर पुण्याला आले होते.तेव्हा त्यांची भव्य मिरवणूक निघाली. श्री शं. ग. चापेकर त्यावेळी वर्ग चालवत. त्यावेळी त्यांनी सावरकरांना हार घातला.व वंदन केले. सावरकरांनी त्यांना विचारले “आपण कोण ?”  ते म्हणाले “मी चापेकर” सावरकर म्हणाले “ चापेकरांनी सावरकरांना हार नाही घालायचा. मीच चापेकराना हार घालायचा कारण मी चापेकर बंधुंपासून स्फूर्ती घेतली. असे म्हणून त्यांनी आपल्या […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ४ – सावरकरांची गुण ग्राहकता

सावरकरांनी १९२९ साली सन्यस्तखड्ग नाटकावर पुण्याच्या श्री. वि.ना. कोठीवाले यांनी टीकात्मक लेख लिहिला तो वाचून सावरकरांनी त्यांना भेटीसाठी बोलावले. व म्हणाले “ तुम्ही माझ्या भाषेतल्या दोषावर टीका केलीत ती बरोबर आहे.पण मराठी नाटके बहरत असताना मी अंदमान येथे तुरुंगात होतो,त्यामुळे मला सद्यस्थितीतिल नाटकाची  भाषा अवगत नाही, मी मराठी नाटकेही मी पहिली नाहीत,पण नाटकाच्या नावाचे जे विवेचन केले आहे ते अगदी योग्य आहे. व लोकापुढे मांडून माझं ध्येय साध्य केले आहे.” […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ३ – सावरकरांचे धैर्य

सावरकर जेव्हा इंग्लंड मध्ये होते तेव्हा तर ते साक्षात सिंहाच्या गुहेत वावरत होते. १ जुलै १९०९ला त्यांचे मित्र मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा खुन केला. लंडनमधील भारतीय लोकांनी त्यांचा निषेध करायला सभा भरवली. आगाखान अध्यक्ष होते. त्यांनी निषेधाचा ठराव वाचून दाखवला आणि विचारले “ ठराव सर्वानुमते सहमत ?” सावरकर ताडकन उठले आणि म्हणाले ”नाही, सर्वानुमते नाही” […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – २ – पुण्यात कपड्याची होळी

विदेशी कपड्याची होळी झाल्यावर इंग्रज सरकार खूप संतापले. फर्गसन महाविद्यालयचे प्राचार्य रेन्गलर परांजपे प्रचंड भडकले. होळीत भाग घेतल्याबद्दल त्यांनी सावरकरांना दहा रुपयांचा दंड केला. पण सावरकरांच्या मित्रांनी निधी उभारला. सावरकरांनी दंड भरला,व उरलेले पैसे “पैसा फंड “ निधीला देऊन टाकला. […]

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १ – बालपणीचे सावरकर

आपल्या दुर्दैवाने आजवर आपल्याला सावरकरांबद्दल पाठ्य पुस्तकातून फक्त दीड पान माहिती दिली गेली. त्यांच, लंडन मधील कार्य,जगप्रसिद्ध बोटीतील उडी,आणि अंदमानातील दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा. पुस्तकातील सावरकर एव्हढ्यावरच  जाणूनबुजून संपवले गेले. गेली ७० वर्षे सावरकरांवर जाणूनबुजून अन्याय केला गेला. केवळ अन्यायच नाही तर बदनामी व उपेक्षा  केली आहे.सावरकर हे केवळ क्रांतिकारक,द्रष्टे, समाजसुधारक किंवा भाषासुधारक नव्हते.तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते.त्यातील काही पैलू माझ्या लिखाणातून  क्रमिक लेखात  मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण पुढील पिढीला व ज्यांना सावरकर आणखी समजून घ्यावसे वाटतात  त्यांच्यासाठी  मी हा अल्पसा प्रयत्न करत आहे,तरी तुम्हाला लिखाण आवडेल अशी मी आशा करतो. […]

गुरुदत्तची अजरामर कलाकृति-प्यासा

एक गाणे तर चक्क मोहमद रफीने कंपोज केले आहे. सचिनदा आले नव्हते, रफीने आधी नकार दिला होता. साहीर आला होता व ते रेकोर्ड झाले नसते तर रेकोर्डिंगचे पैसे वाया गेले असते, ते गाणे होते “तंग आ चुके है “ […]

सिनेमा बनताना -मेरा साया

१९६४ साली त्यांचा वोह कौन थी प्रदाशित झाला व तुफान चालला. म्हणून त्यांनी पुन्हा सस्पेन्स चित्रपट काढायचे ठरवले.त्यांना मराठी चित्रपट पाठलाग इतका आवडला होता कि त्यांनी त्याचे राईटस राजा परांजपे कडून विकत घेऊन मेरा साया काढायचे ठरवले. […]

1 3 4 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..