नवीन लेखन...
Avatar
About राजीव तांबे
श्री राजीव तांबे हे गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. ते मुलांसाठी गंमतशाळा, शिबिरे वगैरेंचे नियमित आयोजन करत असतात. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून विविध वृत्तपत्रांमध्ये ते नियमितपणे लेखन करत असतात. मुलांसाठी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक खेळणी बनविलेली आहेत.

कुकरू

सकाळ झाली. त्याने भराभर आंघोळ केली. दोन वाट्या पाणी प्यायला. थोड्याच वेळात त्याने एक कचकचून शिटी वाजवली. या आवाजाने बाबांची झोप चाळवली. शिटी ऐकून त्याचे इतर मित्र मैत्रिणी गोळा झाल्या. मग त्याला ही चेव चढला. त्याने पुन्हा एकदा शिटी वाजवली! बाकीच्या मित्रांनी पण शिटी वाजवायचा प्रयत्न केला. पण कुणालाच जमलं नाही. त्याने आता जोरात शिटी नाही […]

विंदांच्या १५ व १९ शब्दांच्या बालकविता..

विंदाच्या बालकविता भन्नाटच आहेत. कारण त्या दोन पातळीवर आहेत. जेव्हा त्या कविता मुलं वाचतात तेव्हा त्या त्यांना त्यांच्या वाटतात. आणि जेव्हा मोठी माणसं त्या बालकविता वाचतात तेव्हा त्या कविता त्यांना मुलांकडे पाहण्याचा, मूल समजून घेण्याचा नवीन दृष्टीकोन देतात. या बालकविता मोठ्या माणसांना अधिक प्रगल्भ करतात. मुलांसोबत विंदांच्या बालकविता वाचताना तर मी अनेकवेळा थरार अनुभवला आहे. त्यांची […]

मत, विश्वास आणि वास्तव

युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील तीन हजार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण असे काम माझ्याकडे होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या मास्टर टिचर्सना प्रशिक्षण व भारतातील अन्य प्रयोगशील शाळांना/शिक्षकांना भेटी देऊन शैक्षणिक प्रयोगांचे आदान-प्रदान असे एकंदर कामाचे स्वरुप होते. ‘त्या दोन जिल्ह्यात’ मी जाण्याआधी युनिसेफने कोट्यवधी रुपये शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी खर्च केले […]

डोंगर

एका गावाच्या बाजूला एक मोठा डोंगर होता. या डोंगरावर वेगवेगळ्या फळांच्या फळबागा होत्या. सुंदर सुवासिक फुलांच्या फुलबागा होत्या. भाज्यांचे तरारलेले मळे होते. मलांसाठी खेळायला मस्त प्रशस्त बाग होती. बागेत थुईथुई उडणारं कारंजं होतं. या बागेतून त्या बागेत जायला लाल नागमोडी रस्ते होते. डोंगराच्या वरच्या बाजूला घनदाट जंगल होतं. या डोंगरावर झुळझुळणारे झरे होते. तुडुंब भरलेल्या विहिरी […]

जिवंत चित्र

चित्रकला, आणि निबंधाच्या दरवर्षी आंतरशालेय स्पर्धा होतात. या स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतून फक्त एकच विद्यार्थी निवडला जाई. यावर्षी रैनाच्या शाळेतून तिची निवड निबंध स्पर्धेसाठी झाली होती. रैनाला वाचनाची आवड आहे. तिच्याकडे गोष्टीची आणि वेगवेगळ्या विषयावरची अनेक पुस्तकं आहेत. तिचे आई बाब तिला वाढदिवशी खूप पुस्तकं भेट देतात. तिला चित्र काढण्यापेक्षा वाचायला, लिहायला अधिक आवडतं. रैनाने शाळेच्या मासिकात […]

गावोगावी गंमत शाळा

‘एकदा काही मुले गांधीजींना भेटायला गेली. गांधीजींनी मुलांना विचारले,’तुमचे शिकण्याचे माध्यम कोणते?’ काही मुले म्हणाली,’हिंदी’ तर काही मुले म्हणाली,’इंग्रजी’. गांधीजी म्हणाले,’अरे या तर आहेत भाषा! मी तुम्हाला शिकण्याचे माध्यम विचारतो आहे?’ आता मुले गोंधळली. मुलांना जवळ घेत गांधीजी म्हणाले,’अरे भाषा, गणित, विज्ञान असा कोणताही विषय शिकण्यासाठी तुम्ही तुमचे हात वापरता का? प्रत्यक्ष अनुभव घेता का? ही […]

खरं गणित

नेहमी शेवटचा पेपर गणिताचा असतो. रैना, प्रिया, अर्णव आणि राधा या चौघांनी ठरवलं की यावेळी आपण गणिताचा सॉलीड अभ्यास करायचा आणि भरपूर मार्क मिळवायचे. गणितात दोन प्रकारच्या परीक्षा असतात. लेखी आणि तोंडी. रैना आणि अर्णव लेखी परीक्षेत हुशार. प्रियाला फक्त तोंडी परीक्षेची अजिबात भीती वाटत नाही. राधाला मात्र सगळ्याचीच भीती वाटते. राधाचे बाबा म्हणाले, “अरे मग […]

गोलम गोल पाने.

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. त्यावेळी सगळ्या सगळ्या झाडांची पानं अगदी सारखीच होती. सगळी पानं एकदम गोलम गोल होती. सगळ्या झाडांची, झुडुपांची, वेलींची पानं एकदम गोलम गोल होती. सगळ्या झाडांवर लहान लहान गोल गोल पानं. तर काही झाडांवर मोठी मोठी गोल गोल पानं. झाडांवरच्या वेलीसुध्दा गोल गोल. त्या वेलींची पानं सुध्दा गोल गोल गोल. झाडाखालचं […]

लव्ह स्टोरी

ते रोज एकमेकांना लांबूनच पाहायचे. पण.. बोलणं कधी झालं नाही. कधी कधी ते एकाच तलावात पोहायला जायचे. पण.. त्यावेळी इतकी गर्दी असायची की त्यांना काही बोलता यायचं नाही. कधी ते फिरायला गेले तर लांबूनच चालाचये. त्यामुळे.. बोलणं नाही तर फक्त बघणं व्हायचं. गेलं वर्षभर तो तिच्याशी बोलण्याची वाट पाहात होता. आज तो हात ताणून आरामात निवांत […]

अशोक आणि अमिन

रेहमानपाडा हा मुंबईतला मिश्र लोकवस्तीचा भाग.रेल्वेलाईनच्या कडेकडेने अजगरासारखा पसरलेला. नोकरी मिळेल,रोजगार मिळेल,पोटाची टिचभर खळगी भरेल ह्या आशेने भारतातल्या अनेक भागातून कामसू, जिद्दी माणसं मुंबईत येतात. आणि मग, अगदी अडचणीच्या ठिकाणी पण झोपडी बांधून राहतात.दिवस-रात्र कष्ट उपसतात. थकल्यावर अंग टाकायला घराचा सहारा घेतात. रेहमानपाडा पण असाच वाढत गेलेला. इथे अनेक वाकडे तिकडे गल्लीबोळ.त्यात दाटीवाटीने झोपड्या,बैठी घरं, दवाखाने, […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..