नवीन लेखन...
जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

३१ मे – “वर्ल्ड नो टोबॅको डे”….निमित्ताने ( तंबाखूचे अर्थकारण व आरोग्य )

३१ मे “वर्ल्ड नो टोबॅको डे” ही एका दिवसाची नवलाई न राहता जगातील तंबाखु व्यसनी माणसांनी कायम स्वरूपी रोजच्या जीवनात आमलात आणली तर त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबाची आर्थिक बचत व आरोग्याची काळजी घेतली जाईल.
[…]

मोबाईल !

वापर चांगल्या कार्यासाठी झाला तर खूप फायदा आहे परंतु बर्याच जणांना आजूनही मोबाईल फोन वरून बोलतांना भान राहत नाही आणि इतरांना त्याचा त्रास होतो. बहुतेक वेळा सार्वजनिक ठिकाणी बोलतांना सावकाश व मुद्याचेच बोलावे हे लक्षात न राहिल्याने त्याचे सार्वजनिक भाषण होते व नाकोत्या (गुप्त) गोष्टी सगळ्यांना समजतात आणि त्याचा गुंड फायदा घेतात मग पास्तावला होते
[…]

स्व.पं.विष्णु नारायण भातखंडे

स्व.पं.विष्णु नारायण भातखंडे यांचा जन्म १० ऑगस्ट १८६०रोजी कृष्ण जन्माष्टमी मुंबईच्या वाळकेश्र्वर येथे झाला. त्यांना लहानपणा पासूनच गायनाचे अंग होते. १० १२ वर्षाचे असताना त्यांना बासरी बाजवीण्याचा छंद जडला. मराठी शाळेतील शिक्षण संपवून मुंबईच्या एल्फिंन्स्टन स्कूल मध्ये इंग्रजीचे शिक्षण घेण्यास सुरवात केली. कॉलेज जिवनात पंडितजींना सतार वाजविण्याचे वेड जडले.
[…]

पद्मभूषण उस्ताद अहमदजान थिरकवा खाँसाहेब

बालगंधर्वांच्या गाण्यातील लयची गंमत म्हणजे थिरकवा तर; थिरकवांच्या वाजवण्यातील लालित्य म्हणजे बालगंधर्व ! असे हे थिरकवा बालगंधर्वांनी महाराष्ट्राल दिले तर बालगंधर्वांच्या गुरूनी भास्करबुवा बखल्यांनी ते बालगंधर्वांना दिले. […]

भारतरत्न पं.भीमसेन गुरूराज जोशी

एक सच्चा सत्वशील सूर भीमसेन भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात विरघळून गेलेला एक सुरेख प्रवाह. त्यांची गायकी जेवढी अदभुत तितकीच त्यांची जीवन कथाही अकल्पित. अशा या नाटयपूर्ण जीवनाची आणि अविश्वसनीय वाटेल अशा गानकर्तुत्वाची ही चरित्र मैफल. […]

स्व.पं.पन्नालाल घोष बासरी वादक

स्व.पं.पन्नालाल घोष यांचा जन्म बंगाल मधील बारिसाल गावात ३१ जुलै १९११ साली झाला. त्यांचे व वडिलउत्तम सितार वादक होते. स्व.पं.पन्नालाल घोषजींनी त्यांच्या वडिलांकडून सतार वादनाचे शिक्षण घेतले.
[…]

हौसेला मोल आणि पैश्याला किमंत नाही !

कुठलाही सोहळा मग तो लग्न असो की आणि काही, साजरा करतांना सगळ्याच गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. माझ्याकडे चिक्कार पैसा आहे म्हणजे मी तो कसाही खर्च करीन असे शक्यतो होऊ नये. शेवटी ज्याची त्याची विचारसरणी आहे. कोणावर कुठलीही गोष्ट लादू नयेत या विचारसरणीचा मी आहे. परंतू जी व्यक्ती कष्टाने पैसा कमावते, पैश्याची किंमत काय आहे ते जाणते, ती असा अमर्याद खर्च करणार नाही असे वाटते. पैसा कुठे, कधी, केव्हा व कोणावर खर्च करावा हा ज्याचा त्याचा व्यक्तीक प्रश्न आहे.
[…]

किनारा

प्रत्येक वस्तूला काठ असतो त्याला किनारही म्हंटले जाते. वेगवेगळ्या वस्तूंचे वेगवेगळे काठ व किनारे असू शकतात. अश्याच काही किनार्यांचे वर्णन !
[…]

रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे कितपत योग्य ?

प्रत्येकालाच मुंबईत नोकरी व स्वत:ची जागा असावी असे वाटत असते आणि त्यासाठी देशातील बरीच माणसे मुंबईत पोटापाण्यासाठी नोकरी व राहायला आसरा शोधात असतात. त्यात कित्येक जणांना झटपट श्रीमंत व प्रसिद्धी मिळवायची असते. व्यवसाय व नोकरीत इप्सित साध्य करण्यासाठी मग काही क्लुप्त्या व काळेधंदे करण्यास उद्युक्त होतात.
[…]

शेतकरी नवरा-नको रे बाबा !

आपला भारत कृषिप्रधान देश म्हणून सर्वत्र ओळखला जातो. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रश्न अनुत्तरीतच आहे व त्यावर अजून तरी काही ठोस पाऊले उचल्याची बातमी नाही. नुसते अनुदान देऊन प्रश्न सुटेल असे वाटत नाही.
[…]

1 19 20 21 22 23
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..