नवीन लेखन...
Avatar
About दत्तात्रय पांडुरंग मानुगडे
दत्तात्रय मानुगडे हे ग्रामीण कथा लेखक आहेत. त्यांचे वास्तव्य किर्लोेकरवाडी येथे असते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

आठवणी गावाकडच्या..।

ग्रामीण भागामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा असा आहे. वर्षातील बारा महिन्यांपैकी हा महत्वपूर्ण दिवाळी सण या सणाला गोड गोड खाण्याची मज्जा व खारट चिवडा. प्रत्येकाच्या जिभेला चव देणारा हा चिवडा कायम आठवणीत राहणारा असा आहे. शहरातील दिवाळीपेक्षा ग्रामीण भागातील दिवाळी अतिशय मजेशीर अशी असते. ग्रामीण भागातील नवीन लग्न झालेल्या मुली नागपंचमी गवर गणपती व दिवाळी या सणावर खास करून माहेरी येत असतात. नवीन लग्न झालेल्या मुली यांचा विषय अतिशय रंगेल असा असतो. कार्तिक महिन्यातील दिवाळी दिवाळ काढून गेली तरी आठवण मात्र कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. […]

पत्रकार अर्धा दिवस फिरत होते

मंडळी ही आठवण आहे 1984 सालाची त्यावेळी मी रेल्वे स्टेशन ताकारी येथे रेल्वेत काम करीत होतो. किर्लोस्कर वाडी ला एक माणूस कमी पडला म्हणून मला आमचे रेल्वे स्टेशन मास्तर शि.वी. देसाई यांनी किर्लोस्कर वाडी येथे एक महिना रेल्वे कामासाठी पाठविले होते. रेल्वे स्टेशनवर सायंकाळी पाच नंतर वयस्कर माणसे फिरायला येत होती. या वयस्कर माणसांपैकी काळी टोपी घातलेला पांढरे शुभ्र धोतर नेसलेला व पांढरा शुभ्र सदरा घातलेला एक माणूस रेल्वे बाकावर बसला होता. […]

गावाकडची गोष्ट – हिरा मावशी

मी शाळेत शिकायला असताना अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत. खरंतर मराठी शाळेमध्ये शिकायला मला फार आनंद वाटत असे. वर्गामध्ये भिताडवर रंगीबिरंगी लावलेले सुरेख अक्षरातील तकते वेगवेगळी काढलेली सुरेख चित्रे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सुरेख देखावा पुन्हा पुन्हा पहावा व या चित्रावर ती काहीतरी लिहावे असे माझ्या मनाला नेहमी वाटत होते. त्यातील काही म्हणी अजून आठवतात खत […]

गावाकडची गोष्ट – जिवाचा सखा मित्र

रेल्वे मध्ये कामाला लागण्या अगोदर मी बिगारी काम दुसऱ्याच्या शेतामध्ये करीत होतो. त्यात वडील वारलेले घरामध्ये पैशाची चणचण फार भासत होती.वडीलतरी या जगातून निघून गेले घर रिकामे झाले वडिलांचा आधार नाहीसा झाला. गेली कित्येक दिवस वडील अंथरुणावर पडून होते आधार होता तो आधार नाहीसा झाल्यामुळे. अखंड घर दुःखात बुडाले होते घरात मला अजिबात करमत नव्हते. सोबत […]

गाडी घुंगराची

अशा बैलगाड्या पाहिल्या की पूर्वीची आठवण येते पूर्वी वाहने फार कमी होती. बैलगाडी किंवा सायकल असे प्रवासाचे साधन असायचे. पूर्वीची बैलगाडी व गाडीला झुंपलेली दोन बौले त्यांच्या अंगावर टाकलेले रेशमी वस्त्राचे. रंगीबेरंगी आरशाने नटलेले बैलाच्या अंगावरील झूल अतिशय सुंदर दिसायचे. गाडीत बसलेला शेतकरी त्याच्या डोक्याला बांधलेला टावेल. दोन हातात बैलांची कासरी चाबूक पाठीमागे बैलगाडी मध्ये बसलेली. […]

गावाकडची गोष्ट – कोंबडा चोर

ग्रामीण भागामध्ये पुष्कळ पुष्कळ लिहिण्यासारखे असे असते. सोबतीला हिरवागार निसर्ग पशुपक्षी ओढे-नाले आणि वेगवेगळ्या स्वभावाची माणसे सुद्धा भेटतात. पशुपक्ष्यांची भाषा समजत नाही पण दोन पायाच्या माणसाची भाषा त्याचे वागणे व दैनंदिन जीवन हा एक चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो. मला काही वेळा असे वाटते की या समाजामध्ये वावरणाऱ्या मानवाचे आपण काहीतरी देणे आहोत. आयुष्यमान जगत असताना प्रत्येक […]

शाईपेन,, लेखणी

….. हे शाईचे पेन पहिले की मनाला फार आनंद होतो व असे सुंदर सुंदर पेन पाहिले की डोळ्याचे पारणे फिटते. पूर्वी शाळेला होतो तेव्हा टाक दौत बरु अशा वस्तू असायच्या पण पुढे पुढे टाक व दौत जावूनशाईपेन आले. त्यावेळी अनेक कंपन्या पेपर क्विन या नावाचा पेन बाजारात येत होता. तशा अनेक कंपन्या शाईचे पेन विक्रीसाठी काढत […]

जुन्यातील चांदोबा पुस्तक

… मी लहान होतो तेव्हा चांदोबा या पुस्तकाचा अगदी जवळचा वाचक होतो. त्यावेळी वर्तमानपत्रांची संख्या फार कमी होती ठराविक मासिके ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये वाचाव्यास मिळत होते. वाचनालये शहराच्या ठिकाणी होती शिवाय करमणुकीची साधने सुद्धा अतिशय कमी होती. गावामध्ये काही लोकांच्या घरात हरकुलस कंपनीची सायकल असायचे ठराविक लोकांच्या घरात रेडिओ असायचा. ज्याच्या घरामध्ये रेडिओ आहे त्याला गावामध्ये श्रीमंत […]

ग्रामीण भागातील नागपंचमी

श्रावण महिना म्हणजे जिकडे तिकडे हिरवागार परिसर ओढे नदी नाले पाऊस भरपूर असल्यामुळे खळखळ वाहत असतात. तर काही वेळा महापूर येण्याची सुद्धा शक्यता असते या महिन्यांमध्ये सर्वत्र आनंदी आनंदतरळत असतो. या नागपंचमीला लग्न झालेल्या नवक्या मुली माहेरहून सासरला येतात घरात मुली आल्या म्हणजे घर गजबजून जाते. या महिन्यामध्ये पोषक वातावरण पावसाची रिमझिम तर सारखी चालू असते. पाऊस चालू झाला म्हणजे पावसाच्या रिमझिम मध्ये लहान मुले मुली घराच्या बाहेर पटांगणामध्ये आनंदाने गाणे म्हणतात….। […]

विठ्ठला कोणता झेंडा, घेऊ हाती !

हे कलियुग आहे कलीचा वाऱ्याप्रमाणे ही माणसे वागतात पण सत्य कुठे लपत नाही संत थोर होत त्यांचे विचार आचार वेगळी होत आता या जनतेने कसे वागावे हे तुम्हीच ठरवा यू हवे हल्ली सगळीकडे वातावरण फार वाईट आहे जग बुडी ची वेळ आली आहे इथून पुढच्या काळात तरी प्रत्येकाने सगळ वागावे यातच भलेपणाचा आहे. माणसासारखे वागा माणूस म्हणून जागा आपलं सर्वांना म्हणा […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..