नवीन लेखन...

करामती कॅमेरा

मोबाईलमधील कॅमेरा छायाचित्रे काढण्यासाठी किवा छायाचित्रण करण्यासाठी वापरला जातो. पण, काही अॅप्लीकेशन्सचा वापर केल्यास हा कॅमेरा आपल्याला व्यक्ती, ठिकाण याबद्दलची माहिती देऊ लागतो, स्कॅनर म्हणून वापरता येतो, ट्विटर किंवा फेसबुकवर कोण काय करत आहे हे सांगतो. त्यासाठी मोबाईलमध्ये कॅमेऱ्याबरोबरच जीपीएस, इंटरनेट, कंपास आणि विशिष्ट अॅप्लिकेशन्स असावे लागते. […]

भ्रष्टाचाराला ‘टाटा’ नाही !

सध्याच्या उदारिकरणाच्या प्रक्रियेत भ्रष्टाचाराला उघड पाठिंबा मिळत आहे. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्याला विमान कंपनी उभी करण्यासाठी ठरावीक मंत्र्याला लाच देण्याचा सल्ला मिळाल्याचे सांगितले. उद्योगपती राहुल बजाज यांनी तर अशी लाच सर्रास दिली जाते असे सांगून आणखी एक गौप्यस्फोट केला. एकंदरित, भ्रष्टाचाराला ‘टाटा’ करण्याची कोणाचीच मानसिकता दिसत नाही. […]

अन्नधान्याच्या लागवडीला हवे प्राधान्य

राज्यात आता रब्बी हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, यावेळी ज्वारीचे उत्पादन घटण्याचे संकेत आहेत. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ अपेक्षित असताना पहायला मिळणारी घट चिंताजनक आहे, याचा शेतकर्‍यांनी विचार करायला हवा. त्यामुळे पर्यायी पिकांची लागवड करताना अन्नधान्याच्या लागवडीलाही महत्त्व द्यायला हवे आहे. […]

हे सत्तांतर काय सांगते ?

एक चव्हाण गेले आणि दुसरे चव्हाण आले. राज्याच्या राजकारणात किंवा समाजकारणात त्यामुळे काय स्थित्यंतर येईल? पृथ्वीराज चव्हाण राज्याची धुरा व्यवस्थित सांभाळू शकतील का? राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजी उफाळून आली असून छगनराव भुजबळ यांचा काटा पक्षातील मराठा लॉबीने काढल्याने अंतर्गत धुसफूस वाढेल का ? ही स्थित्यंतरे काय दर्शवतात?
[…]

ओबामांची मुत्सद्दी भारतभेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीदरम्यान काय भूमिका घेतील याबद्दल सर्वांनाच कुतुहल होते. या दौर्‍यात ओबामा यांनी भारताभिमुख भूमिका घेतली तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीतील भारताच्या कायम सदस्यत्वाला पाठिंबा देऊन त्यांनी खूष केले; परंतु जाता-जाता भारताने इराणच्या अणुकार्यक्रमाला तसेच म्यानमारमधील मानवी हक्कांच्या पायमल्लीला विरोध करावा असे सुचवून स्वत:चे हित साधले.
[…]

‘आदर्श’ हकालपट्टी

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कुजबूज संपली आणि अशोक चव्हाण पायउतार झाले. त्यांचा राजीनामा घेऊन काँग्रेसने काही संकेत दिले असले तरी प्रश्न कायम आहेत. एखाद्याने गैरव्यवहार केला की हकालपट्टी होते पण भ्रष्टाचारही पचवला जातो असे चित्र उभे रहात आहे. कलमाडींबाबतही नेमके हेच घडले आहे. ताज्या बदलामुळे जनतेला क्षणभर बरे वाटेलही पण समाजाभिमुख राजकारणापासून आपण आजही कोसो दूर आहोत.
[…]

सोनेखरेदीपूर्वी…

डिसेंबरअखेरपर्यंत चालणार्‍या सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर सोनेखरेदी केली जाते. ब्रॅंण्डेड बार्स, कॉईन्स आणि दागिन्यांच्या स्वरूपात ही सोनेखरेदी केली जाते. पण, आता गोल्ड इटीएफसारखे अधिक सुरक्षित आणि आकर्षक पर्याय उपलब्ध झाले आहेत. या पर्यायांचा उपयोग करावा असे तज्ज्ञांचे मत आहे. नेहमी चांगला परतावा देणार्‍या सोन्याच्या बाजारपेठेविषयी.
[…]

आली दिवाळी सोनपावलांनी

सोनपावलांनी येणार्‍या दिवाळीतील प्रत्येक दिवसाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवस थाटामाटात साजरा केला जातो. आजकाल केवळ हिदू लोकच नव्हे तर इतर धर्माचे लोकही लक्ष्मीपूजन करतात. हा सण सर्वांना आनंद आणि समृद्धी देणारा ठरतो. दिवाळीशी माझ्याही काही चांगल्या-वाईट आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत. […]

चव्हाणांचे भवितव्य अधांतरीच

मुंबईच्या आदर्श गृहनिर्माण संस्थेतील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना तातडीने राजीनामा देण्यास सांगितले. त्यामळे पुढे काय होणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. पण एकूण राजकीय घडामोडी लक्षात घेता चव्हाणांची गच्छंती लांबणीवर पडल्याचे दिसते. या प्रकरणी नेमलेल्या समितीला चौकशीसाठी लागणारा वेळ आणि ओबामांचा मुंबई दौरा लक्षात घेऊन चव्हाणांना तूर्तास मुदतवाढ मिळाली आहे. […]

उत्सव प्रकाशाचा; फटाक्यांचा नव्हे

दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण मानला जातो. फटाक्यांच्या आतषबाजीने या उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो. परंतु, फटाक्यांमुळेमोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण होते. फटाक्यांमधील विषारी रसायनांचा मानवी शरीरावर विपरित परिणाम होतो. मानवाप्रमाणेच जीवसृष्टीलाही धोका पोहोचतो. ही सर्व हानी रोखण्यासाठी दिवाळीमध्ये फटाक्यांच्या वापरावर काही मर्यादा आणल्या पाहिजेत. […]

1 2 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..