नवीन लेखन...

द अदर साईड ऑफ सोल !

द अदर साईड ऑफ सोल ! अर्थात , न लिहिलेल्या आत्मचरित्रांतून उडालेले आत्मे !!!

शीर्षक वेगळंच वाटतंय ना ?
आहे वेगळंच , पण ते सहज नाही स्फुरलेलं .
काहीतरी सांगायचंय , सुचवायचंय .
काहीतरी लक्षात आणून द्यायचंय .
कुणाच्यातरी मनातलं, शब्दात उतरवायचंय .

तुम्ही कधी आत्मचरित्रं वाचली आहेत ?
प्रसिद्ध व्यक्ती , कलाकार , खेळाडू , उद्योगपती , अभिनेते , अभिनेत्री , साहित्यिक किंवा अशाच वर्गवारीतील कुणाची आत्मचरित्रं , मनोगतं किंवा दुसऱ्यांनी केलेली आत्मकथनाची शब्दांकनं ?

वाचली असाल कदाचित .
आपण कसे घडलो , वाढलो आणि जगावेगळं काय काय केलं , ते सांगणारी .
आत्माविष्कारी प्रेरणा असणारी .
समाजाला दीपस्तंभ असू शकणारी .
प्रेरणादायक . लाभदायक .
दुःखाचे उमाळे आणि सुखाबद्दल आसक्ती नसणारी वगैरे , वगैरे…

पण आपल्या शीर्षकाशी त्याचं काय नातं , असा प्रश्न मनात उद्भवेल .

आपण जी आत्मचरित्र वाचतो , त्यापेक्षा अनेकांच्या मनात वेगळी आत्मचरित्रं लिहिली जात असतात . ती प्रत्यक्ष कागदावर कधीच येत नाहीत . किंवा तशी ती कागदावर येऊ नयेत म्हणून अनेकजण आटोकाट प्रयत्न करीत असतात .

अशी न लिहिली गेलेली आत्मचरित्रं , खूपच वेगळी असतात . अनवट वाटेनं जाणारी असतात . प्रचंड धक्कादायक असतात . खूप गुपितं लपवून ठेवणारी असतात . समाजात गदारोळ करणारी असतात . अनेकांचे बुरखे टराटरा फाडणारी असतात . नातेसंबंध ओरबाडून टाकणारी असतात . अशी आत्मचरित्रं सप्तरंगी नसतातच तर कृष्णधवल रंग त्यात मजबूत असतो .

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ,अशा आत्मचरित्रांचे नायक हे सर्वसामान्य असतात . त्यामुळे त्यांनी न लिहिलेल्या आत्मचरित्रातील त्यांचा आत्मा हा केव्हाच उडून गेलेला असतो .

अशा न लिहिलेल्या आत्मचरित्रातील काही पाने माझ्या हाती लागली .

हे वाक्य शब्दशः घेऊ नका , आलंकारिक अर्थानं घ्या . कारण आत्मचरित्रं काल्पनिक आहेत . पण वास्तवदर्शी आहेत .
आपल्या नायकांच्या आत्म्याची दुसरी बाजू , जी कधी मनाबाहेर येतच नाही , ती त्या नायकांना उलगडून दाखवायची आहे .अर्थात त्या आत्मचरित्रातून आत्मा उडून गेलेलाच आहे , मी फक्त निमित्तमात्र .

आता त्या आत्मचरित्रातील पानं केव्हा वाचायला मिळणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल .
तर मंडळी , कदाचित आज संध्याकाळपासून आत्मचरित्रातील मला सापडलेली काही पानं मी तुमच्यासाठी सादर करीन .

अट एकच .
लेखन वाचायचं , विचार करायचा आणि नावासह सर्वाना पाठवायचं , शेअर करायचं .
चला तर ,
प्रतीक्षा करू या …

द अदर साईड ऑफ सोल !
अर्थात , न लिहिलेल्या आत्मचरित्रातून उडालेले आत्मे !!!

— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..