नवीन लेखन...

जग

मी म्हणालो जगाला मला फक्त तुझ्यासाठी आणि स्वतःसाठी जगायचयं… जग म्हणालं मला माझ्यासाठी जगं पण टाळं स्वतःसाठी जगायचं… मी बदललो जगाच्या कल्याणासाठी पण आता जगचं मला बदलतयं… जगात बदल घडवणं आता अशक्य आहे कारण जग आता पाषाण झालयं… © कवी – निलेश बामणे ( एन.डी.) दिनांक – 9 मार्च 2016

जरा हसून पाहा !

आपण पाहातो, अनुभवतो की मानसिक ताणतणावामुळे प्रथम मनाचं आणि नंतर शरीराचं आरोग्य धोक्यात येतं. कारण ताणतणाव हे मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. एकदा अंतरंगातच बिघाड झाला तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसायला कितीसा वेळ लागणार? मग या ताणतणावाच्या अगदी विरुद्ध क्रिया केली तर? आपलंच शरीर आणि मन. त्यात दोन वेगवेगळ्या भावनांच्या प्रभावाने जर दोन वेगळे परिणाम मिळणार […]

घटस्फोट आणि भारतीय संस्कार…

आपल्या देशात हल्ली घटस्फोटाचं प्रमाण वाढू लागलयं हा कित्येकांसाठी चिंतनाचा आणि चिंतेचा विषय ठरू लागलेला आहे. आपल्या देशातील हे वाढतं घटस्फोटाचं प्रमाण दिवसेन- दिवस वाढतच जाणार आहे त्यामुळे भविष्यात आपल्या देशातील घटस्फोटाचं प्रमाण कमी होईल या भ्रमात कोणीच राहाता कामा नये आणि ते प्रमाण कमी व्हाव म्ह्णून प्रयत्न करणे म्ह्णजे उंठावरून शेळ्या हाकण्यासारखे आहे. त्यामुळे घटस्फोटाच्या […]

कृतज्ञता ब्रह्मांडाशी !

दुसऱ्याचा अपमान करून क्षणभर आनंद घेऊन नेहमीसाठी आतल्या आत यातना भोगणे अशी नकारात्मकता निरर्थक आहे. याउलट भारतीय संस्कृती तुमच्याच सुखासाठी कृतज्ञतेचा संस्कार देते. एखाद्या व्यक्तीने मोठ्या मनाने संकटात तुम्हाला मदत केली. त्याने ही मदत अगदी निरपेक्ष भावनेने केलेली असते. त्याला त्याबद्दल काही परत मिळावे ही अपेक्षाही नसते. पण त्याने संकटकाळी तुम्हाला केलेली मदत किती मोलाची होती […]

वध आणि खून : गांधीजी आणि अन्य – भाग १

दिनांक १३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राच्या पान २ वरील, एका बहुचर्चित विषयाशी संबंधित ठळक बातमी वाचून त्याबद्दल स्पष्टीकरण मांडावे असे वाटले, म्हणून हा प्रपंच. बातमीचे शीर्षक व उपशीर्षक असे आहे : ‘गांधींचा वध नव्हे, तर खूनच ! : कुलगुरूंचे भाषण मधेच थांबवत शरद पवार यांची सूचना …’ . गेली अनेक वर्षें या विषयावर चर्विचर्वण […]

वध आणि खून : गांधीजी आणि अन्य – भाग २

दिनांक १३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राच्या पान २ वरील, एका बहुचर्चित विषयाशी संबंधित ‘गांधींचा वध नव्हे, तर खूनच ! : कुलगुरूंचे भाषण मधेच थांबवत शरद पवार यांची सूचना …’ ही ठळक बातमी वाचून त्याबद्दल स्पष्टीकरण मांडावे असे वाटले, म्हणून लिहिलेल्या लेखाचा हा पुढील भाग. संस्कृती, पुरातन वाङ्मय, इतिहास वगैरेंच्या आधारने या विषयाची चर्चा करू […]

लग्न म्हणजे काय असतं ?

लग्न म्हणजे काय असतं ? एक चुकलेलं गणित असतं कारण तिथे एक आणि एक तीन असतं… लग्न म्हणजे काय असतं ? उगाच त्याग करणं असतं कारण त्यातून काहीतरी मिळवायचं असतं लग्न म्हणजे काय असतं ? दोन जीवांचं मिलन असतं कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं लग्न म्हणजे काय असतं ? मोक्षाकडे नेणारं दार असतं कारण […]

जगणें अटळ असतां

वाट कुणाची बघतो आम्हीं, ठाऊक असते सर्वांना, मृत्यू हा अटळ असूनी, केव्हांही येई अवचित क्षणा ।।१।।   आगमनाचा काळ त्याचा, कल्पनेनें ठरविला जातो, अचूक जरी शक्य नसले, विचार त्यावरी करीता येतो ।।२।।   जीवन म्हणती त्या काळाला, जगणे आले मृत्यू येई तो, जगण्यापुढे पर्याय नसतां, सुसह्य करण्या प्रयत्न होतो ।।३।।   तन मनाला सुख देऊनी, जीवन […]

तू भेटलीस की…

तू भेटलीस की का बेचैन होते वेडे मन माझे… तू भेटलीस की का होतात डोळे ओलेचिंब माझे… तू भेटलीस की का काळीज होते कासाविस माझे… तू भेटलीस की का व्यर्थच भासे हे जीवन माझे… तू भेटलीस की का बेभान होते सारेच ग माझे… © कवी – निलेश बामणे ( एन.डी.) दिनांक – 9 मार्च 2016

स्थिर वा अस्थिर

स्थिर आहे जग म्हणूनी, अस्थिर आम्ही जगू शकतो । अस्थिर आहे जग म्हणून, स्थिर आम्ही जगू शकतो ।।१।।   पोटासाठी वणवण फिरे, शोधीत कण कण अन्नाचे । थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे ।।२।।   धरणी फिरते रवि भोवतीं, ऋतूचक्र हे बदलीत जाते । जगण्यामधला प्राण बनूनी, चैतन्य सारे फुलवून आणते ।।३।।   पूरक बनती […]

1 5 6 7 8 9 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..