नवीन लेखन...

शेकडो वर्षांच्या प्राचीन परंपरेचा साक्षी – वासाळामेंढा येथील श्रावणी सप्ताह !

आमच्या भारतात अनेक आदर्श परंपरा कोणताही गाजावाजा न करता वर्षानुवर्षे सुरु आहेत. यापैकीच एका, उदात्त हेतूने सुरु झालेल्या परंपरेचा हा एक धावता आढावा.
[…]

ब्रिटिशकालीन गॅझेटिअर

ब्रिटिश कालखंडामध्ये स्थानिक प्रशासन सुकर व्हावे, तत्कालीन जिल्हाधिकार्‍याला या भूप्रदेशाची पूरेशी माहिती असावी आणि येथील जाती, जमातीचे तपशिल ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी म्हणून ज्ञात व्हावे हा मुख्य हेतू मनात ठेवून येथील जास्तीत जास्त महसूल वसुलीच्या दृष्टीने आवश्यक तपशील पुरवणारा ग्रंथ म्हणून जिल्हा गॅझेटिअर्सची निर्मिती झाली. […]

संवर्धन मराठीचे

मराठी भाषेचा विकास व्हावा, तिचे संवर्धन व्हावे, वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि कोल्हापुरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पुढाकाराने अनोखी संकल्पना साकारत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयाच्या आवारात मराठी ग्रंथदालन उभारण्याची योजना आकारास येत आहे.
[…]

संस्कृतीचा पुजारी

विलासरावांच्या सहवासातून मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसले. उत्तम राजकारणी, उत्तम प्रशासक, प्रगल्भ विचारांचा माणूस, सहृदय मित्र अशी अनेक गुणवैशिष्ट्ये विलासरावांच्या ठायी होती. महाराष्ट्राच्या बहुजन समाजाची तसेच नागरी समाजाची उत्तम जाण असणारा नेता, सरपंचापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास आणि केंद्रीयमंत्रीपदापर्यंतची ही वाटचाल अत्यंत कष्टाची होती. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीच्या राजकारणातही मोठ्या परिश्रमपूर्वक पद्धतीने स्थान निर्माण केले. त्यांच्या या वाटचालीचा मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान वाटत राहील. त्यांची ही कारकीर्द आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक मराठी माणसाच्या मनात सदैव घर करुन राहील. 

– मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक

[…]

कुशल संवादपटू विलासराव

माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी असंख्य लोकांच्या मुलाखती घेत त्यांच्याशी संवाद साधला आहे. यापैकी काही माणसे चांगलीच स्मरणात राहिली आहेत. त्यापैकी विलासराव देशमुख हे एक व्यक्तिमत्त्व. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर त्यांच्याशी संवाद साधतानाचे ते सारे क्षण मनाच्या किनार्‍याशी ताजे होत डवरले. 

– सुधीर गाडगीळ

[…]

“मनसे”ला नवी दिशा

मुंबईत रझा अकादमीने काढलेल्या मोर्चानंतर हिंसाचार करणार्‍या दंगेखोरांविरुद्ध ठोस कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परवा काढलेला मोर्चा आणि नंतरची विराट जाहीर सभा या संघटनेच्या यापुढील वाटचालीला नवी दिशा देणारी ठरणार आहे. एवढ्या प्रचंड संख्येने कार्यकर्ते एकत्र येऊनही अत्यंत शांततामय रीतीने ही सभा आणि मोर्चा पार पाडून मनसेने आपली संघटना ही हुल्लडबाजांची संघटना नाही आणि आपल्याकडे यापुढील काळात अधिक गांभीर्याने पाहावे लागेल असेच जणू सूचित केलेले आहे.

श्री. परेश प्रभू
संपादक, नवप्रभा

[…]

बांगला घुसखोरांचे लाड व मतपेटीचे राजकरण

आसामातील हिंसाचाराचे पडसाद देशाच्या अन्य भागांत उमटल्यानंतर, ईशान्य भारतीयांचे जिवाच्या भीतीने पलायन सुरू झाले. अशातच १९ ऑगस्टला बंगळुरूहून गुवाहाटी एक्स्प्रेसने आसामकडे निघालेल्या नऊ आसामी नागरिकांना, अज्ञात समाजकंटकांनी बेदम मारहाण करून लुटले आणि नंतर धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या मारहाणीत अन्य सात जण गंभीर जखमी झाले. या देशाला गृहमंत्री आहे, ही एक अफवाच ठरल्याने लोकांनी जीव वाचविण्यासाठी माघारी परतण्याची धावपळ सुरू केली होती.
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..