नवीन लेखन...

selfie

आजचे युग ‘मोबाईल युग आहे. बाल-वृद्ध, गरीब-साहूकार सर्वजण ह्या मोबाईलच्या आकर्षणामध्ये फसले आहेत. रामायणामध्ये जसे सीतेला सोनेरी हरण मोहीत करून गेले तसेच आज सगळ्यावर ह्या मोबाईलची जादू झाली आहे. काही वर्षांपूर्वी एखादा व्यक्ती एकटाच बोलताना दिसला की लोक त्याला वेडा म्हणायची पण आज ९०% लोक ह्या मोबाईल मुळे वेडी झालेली दिसून येतात.

आजचा विद्यार्थी वर्ग तर ह्या मोबाईलचा शिकार झाला आहे. एक वेळ अशी होती की मुल-मुली कॉलेज मध्ये गेले की ‘त्यांना पंख फुटले, आता त्यांना सांभाळायची गरज आहे’ असं पालकांना वाटायचे परंतु वर्तमान परिस्थिती अशी आहे की जन्माला मुल आल्यापासून पालकच त्या लहान मुलांना अन्न भरवताना मोबाईलवर cartoon दाखवतात, मोबाईलवर hallo बोलायला शिकवतात. बोलताही येत नसल तरी मोबाईलच्या कितीतरी गोष्टी त्या चिमुरड्याना ही कळतात. काय ह्या मोबाईलची जादू म्हणायची?

Face is the index of mind म्हटले जाते. मनाची अवस्था चेहऱ्याच्या हावभावांनी समजू शकतो. परंतु आजचा मानव दुहेरी भूमिका करण्यात पटाईत झाला आहे. कधी-कधी तर आपले विचार आणि वाणी ह्यामध्ये कुठे ताळमेळ ही नसतो. मनामध्ये नकारात्मक , ईर्षा, घृणा ……. ची भावना ठेवून ही सुंदर हास्य चेहऱ्यावर आणू शकतो. फक्त बाह्यरूप सुंदर-मोहक असणे महत्त्वाचे की गुणांनी सुंदर असणे आवश्यक?

सेल्फी अर्थात स्वतःचा फोटो. तसेच सेल्फ अर्थात मी आणि i.e. अर्थात म्हणजे .selfie अर्थात मी म्हणजे. खरचं स्वतःला विचारुन पहा, मी म्हणजे कोण?मी म्हणजे एखादी व्यक्ती, पद, लिंग, जाती….? हे तर समयानुसार बदलत राहते. लहान मुल जेव्हा जन्माला येते तेव्हा त्याच्याकडे न नाव, जाती, पद, धन …… काही पण तर नसत. मग मी म्हणजे? शरीर तर नश्वर आहे. एक वस्त्र आहे, साधन आहे पण त्याला चालवणारी मी एक उर्जा आहे. ज्यालाच आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हटले आहे. ही चेतना जो पर्यंत शरीरात आहे तो पर्यंत जीवन आहे.चेतना निघून गेली तर त्याला अर्थी म्हटले जाते. अर्थात ज्या शरीराला आता काही अर्थ नाही (deadbody). किती ही सुंदर शरीर असले तरीही आपण त्याला काही तासांसाठी सुद्धा ठेवत नाही. शारिरीक सुंदरता ही अल्पकालिन आहे. म्हणून म्हटले जाते रूपवान पेक्षा गुणवान असणे गरजेचे आहे. मनुष्याची value त्याच्या मधल्या values (गुणांनी) नी होते.

रूपवान बनण्यासाठी कितीतरी beauty parlor आहेत. पण गुणवान बनण्यासाठी काही आहे? आज लहान मुलांना ही beauty parlor किंवा saloon मध्ये घेऊन जातो पण त्याचबरोबर गुणवान बनवण्यासाठी कोणते प्रशिक्षण दिले जाते? हिंदीमध्ये एक म्हण आहे ‘आप कितना जीये उसका महत्व नही परंतु आप कैसा जीये उसका महत्व है’

जीवनाच्या अल्बम मध्ये आपण स्वतःच्या कर्मांचे pose बघावे. व्यक्ति परत्वे बदलणाऱ्या आपल्या भावना आणि चेहऱ्यावर आलेले हावभाव ह्यांना न्याहाळावे. काही जण दिवसातून कित्येक वेळा वेगवेगळ्या angle ने फोटो काढतात आणि ते फोटो facebook,WhatsAppवर टाकताना जेणेकरून सर्व परिचित लोकांनी मला बघावे. आपण दिलेली pose किती दिवस त्यांच्या मानस पटलावर राहिल?परंतु मी केलेले कर्म परिचित तसेच अपरिचित लोकांसाठी ही एक संस्मरण बनेल.

आपण सुंदर विचारांनी स्वतःला तसेच आपल्या जीवनाला सुंदर बनवावे. व्यक्तीची ओळख त्याच्या व्यवहाराने, कर्मांनी होते म्हणून महान कार्य करणाऱ्यांना महात्मा म्हटले जाते. आणि जे महान कार्य करतात त्यांना स्वतःची ओळख द्यावी लागत नाही पण लोकच त्यांच्या कार्यांनी त्यांना ओळखतात. अशा व्यक्तींना सेल्फी काढायची गरज लागत नाही पण लोकच त्यांचा फोटो काढतात. स्वतःला त्यांच्यासारखे बनवण्याचा प्रयत्न करतात अशा महान विभूतींना आपल्या जीवनाचा आदर्श बनवतात.

विचारांना सुंदर बनविण्यासाठी रोज सकाळी स्वतःला फक्त एक सुविचार पक्का करावा. दिवसाची सुरुवात जर सुविचारांनी झाली तर मनाची अवस्था चांगली ठेवण्यास मदत मिळते. आपले बदलणारे mood, आपल्या चेहऱ्याची दशा ही बदलत राहतात म्हणून रोज एखादा सुंदर विचार दिवसभर ‘मंत्र’ पाठ करण्यासारखा रटत रहावा ज्याने त्या विचारांचा प्रभाव आपल्यावर होत राहील. उदा. मी खूप सुखी आहे किंवा मी खूप भाग्यवान आहे, मी खूप शांत आहे……… . छोटे-छोटे अभ्यास सतत स्वतःला देत राहिले तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम कालांतराने आपल्याला दिसून येईल.
जसे फोटो काढताना खास आपण smile देतो जेणेकरून मी खुश आहे हे सगळ्यांना कळावे. जर चेहऱ्यावर हसू नसेल तर खास हसण्याचा प्रयत्न करतो पण सुंदर विचार, चांगला mood असेल तर कृत्रिम हास्य आणावे लागत नाही पण तो फोटो natural सुंदर वाटतो. अश्या चेहऱ्याला कोणत्या ही angle ने बघितले तरी तो सुंदरच वाटतो. म्हणून आपण बाह्य गोष्टींवर मेहनत करण्याऐवजी आंतरिक अवस्थेवर मेहनत करावी जेणेकरून कधी स्वतःच्या जीवनाला न्याहाळताना संतुष्टतेचा अनुभव होईल.

चला तर मग आजपासून प्रत्येक क्षणाचा आनंद सुखद विचारांनी घेऊन नैसर्गिक हास्य चेहऱ्यावर आणू या, सत्कर्मांची pose नेहमीच देऊन स्वतःचे selfie काढू या. कधी-कधी रिकाम्या वेळी ह्या selfies ना बघून मनाला सुखद आठवणींनी भरुन टाकू या.

— ब्रह्माकुमारी नीता

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..