नवीन लेखन...

वर्‍हाडातली गाणी – १

पहिली गं पुजाबाई देवा देवा सा देव

साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा

खंडोबाच्या नारी बाई वर्षा वर्षा आवसनी

आवसनीच पाणी जस गंगेच पाणी

गंगेच्या पाण्याला ठेविला कंठ

ठेविला कंठ राणा भुलाबाईची

ठोकिला राळा हनुमंत बाळा

हनुमंत बाळाचे लांब लांब डोळे

टीकाळीचे डोळे हात पाय गोरे

भाऊ भाऊ एकसनी

माता पुढ टेकसनी

टेकसनीच एकच पान

दुरून भुलाबाई नमस्कार

एवढीशी गंगा झुळूझुळू वाहे

तांब्या पितळी न्हाय गं

हिरवी टोपी बाय गं

हिरवी टोपी हारपली

सरपा आड लपली

सरप दादा हेकोडा

जाई आंबा पिकला

जाई नव्हे जुई नव्हे

चिंचाखालची रानोबाय

चिंचा वेचत जाय गं

शंभर पान खाय गं

खाता खाता रंगली

तळ्यात घागर बुडाली

तळ्या तळ्या साखळ्या

भुलाबाई जाते माहेरा

जाते तशी जाऊ द्या

थालीभर पाण्याने न्हाऊ द्या

बोटभर मेण लाऊ द्या

बोटभर कुंकू लाऊ द्या

जांभळ्या घोड्यावर बसु द्या

जांभळ्या घोड्याचे उलटे पाय

आऊल पाऊल अमरावती गाव

अमरावती गावचे ठासे ठुसे

दुरून भुलाबाई चे माहेर दिसे

Avatar
About विजय लिमये 49 Articles
श्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..