नवीन लेखन...

गाण्याच्या कहाण्या – ये दिल और उनकी निगहो के साये

प्रेमात पडलेली एक सुंदर ‘ ती ‘ . आपल्या ‘त्याचा ‘ सोबत घालवल्या क्षणाच्या आठवणीत निथळणारी . ‘आठवणीत निथळणारी ‘ म्हणजे ‘तो ‘सोबत नाहीय !पण त्याचा विरह किती गोड आहे ! येथे झुरणं नाही कि ,रडणं नाही , तर आनंदच उधाण आहे ! विरह आणि आनंदच उधाण एकत्र कसे ? तर ‘ तो ‘ फक्त तिच्या मनातच नाही तर , आसपासच्या बर्फाच्छादित पर्वत राईत , लगतच्या हिरव्यागार दऱ्याखोऱ्यात , त्यातल्या पायवाटेत , तेथे वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात , काठावरच्या उंच झाडांच्या शेंड्यावरून सरकणाऱ्या ढगात , तेथील शीतल वाऱ्याचा झुळकेत तो तिला जाणवतोय , त्याच्या प्रेमाची उब ती अनुभवतेय ! ‘मुझे घेर लेते ,है बाहो के साये ‘ असे तिला वाटते आहे ! हीच तर खरी प्रेमाची लज्जत असते!

हि सुंदर कल्पना आहे एका तरल मनाच्या कवीची , जान निसार अख्त्तर याच्या एका गीताची !

‘ ये दिल और उनकी ,निगहो के साये
मुझे घेर लेते ,है बाहो के साये ‘

हे गाणे आहे १९७३ सालच्या ‘प्रेम परबत ‘मधलं . हि एक ‘ लॉस्ट फिल्म ‘ आहे . म्हणजे आजमितीस या सिनेमाची एकही प्रिंट अस्तित्वात नाही ! इतक्या सुंदर गाण्याची मूळ प्रत नसावी हा सिने रसिकांचा दैव दुर्विलास आहे नाही तर काय ?

पण खरे सांगू या गाण्याला ‘पहाण्याची ‘गरज कधीच पडणार नाही ! जान निसार याचे शब्द ,लताजींचा आवाज आणि जयदेव यांचे संगीत —– फक्त डोळे मिटून गाणं ऐका , तुमच्या मनाच्या ‘सिनेमास्कोप स्क्रीनवर ‘ लोभस लोकेशन वरील (हिमालयाच्या पायथ्याचा परिसर आठवा ) पिक्चरायझेशन साकारेल ! अहो ,इतके जबरदस्त कंपोझिशन आहे या गाण्याचे . गीतकारांनी ‘ ती ‘च्या आठवणी सोबत निसर्गाची ‘सैर ‘ करवली आहे . हा गृहस्थ हे गाणे लिहताना शाई आणि पेन ऐवजी रंग आणि ब्रश घेऊन बसला होता कि काय ?,अशी शंका येते ! गाण्याच्या प्रत्येक कडव्यात एक ‘चित्र ‘ जाणवत !

लताजींचा आवाज या गाण्यातील शब्दांना अर्थ देवून जातो . त्यांचा आवाज या गाण्याची ‘जान ‘आहे . या गाण्यातील त्यांचा आवाज मल्टिडायमेन्शल आहे . म्हणजे शब्दांचा अर्थ ,त्यांचं त्यामागच्या भावनेचा संदर्भ , वातावरण निर्मिती ,सबकुछ प्रगट करून जात . ऐकणाऱ्याला सोबत घेऊन जात . संमोहित करून टाकत !गाण्याच्या सुरवातीला लालाजींनी जो ‘हू SSS म , हू SSS म ‘ हुंकार लावलाय तो आपल्याला सोबतच्या सरोद आणि बासरीच्या सुरात लपेटून हिमालयाच्या कुशीत कधी घेऊन जातो काळतही नाही ! वर तेथेच गाणंभर झुलवत ठेवतो ! पहिल्या कडव्यात ‘हवा हर नदी का बदंन चुमती है ‘ हि ओळ ऐकताना ओलसर वाऱ्याची , त्याचा लेमन फ्रेश वासा सगट , झुळूक जाणवते ,तर दुसऱ्या कडव्यात ‘ बहुत ठंडे -ठंडे ,है चाहो के साये ‘ ऐकणाऱ्याच्या कानात थंडगार वाऱ्याची फुंकर मारून जाते ! लताजींचा आवाज तसा गोडच आहे ,पण सी .रामचंद्र ,मदन -मोहन , सलील चौधरी आणि जयदेव यांच्या संगीतात तो बहरून येतो . कारण हे त्यांचे आवडते संगीतकार आहेत . लताजींच्या गाण्याची क्रमवारी लावणे एक कठीणच नाहीतर अशक्य काम आहे ,तरी त्यांच्या गाण्यात या गाण्याला ‘विशेष उच्च स्थान ‘ द्यावे लागेल .

या गाण्याचे संगीतकार आहेत जयदेव . खरेतर हे गाणे त्यांनी या सिनेमासाठी केले नव्हते ,पण दिग्दर्शक वेद राही याना हे गाणे इतके आवडले कि त्यांनी ते या सिनेमात घेतलेच . जयदेव यांनी हे गाणे राग पहाडी वर बेतलंय . हा हिमालयातील पहाडी लोक संगीतावर आधारित राग . या रागात लय आणि गती अफलातून असते . आपल्याला ती या गाण्यातही जाणवेल .या रागाला वेळेचे बंधन नाही . केव्हाही हा गाता येतो . या गाण्यात लताजीनच्या आवाजास सरोद ,बासरीची साथ उत्तम लाभली आहे . उदाहरण म्हणून गाण्यातला एक स्पॉट सांगतो . दुसऱ्या कडव्यांची पहिली ओळ आहे ‘ लिपटते ये पेढोसे ,बादल घनेरे ‘ या ओळी च्या शेवटी ,जो बासरीचा पीस वाजवलंय ,तो आपल्या सूरांसोबत ऐकणाऱ्याला उंच असलेल्या त्या ‘ घनेऱ्या बादल ‘ पर्यंत उडवत नेतो ! गाण्याच्या गती साठी तबल्याला आठ मात्रांचा केरवा जुंपलाय !

जयदेव एस . डी . बर्मन कडे सहायक होते . १९६१च्या ‘हम दोनो ‘ ने त्यांना लाईम लाईट मध्ये आणले . तसा हा गुणी संगीतकार सामान्यांच्या ‘काना ‘पासून काहीसा दूर आणि दुर्लक्षितच राहिला . व्यावसायिकतेचा आलेख कमीच पडला . हरिवंश राय बच्चन यांच्या ‘मधुशाला ‘चा मन्नाडेच्या आवाजातील अल्बम यांचाच . (माझा तो ऐकायचा राहून गेलाय .) जयदेव यांचे शेवटचे योगदान प्रसिद्ध टी .व्ही . सिरीयल ‘रामायण ‘ला लाभले . प्रसिद्धी साठी सिद्धी आवश्यक असते ,पण साऱ्याच सिद्धाना प्रसिद्धी मिळत नाही ! तसेच काहीसे जयदेवांन बाबतीत झाले असावे .

तर असे हे राग पहाडीतले सुंदर गाणे . ऐकणाऱ्या कानांना मेजवानी .’ प्रेम ‘ करणाऱ्यांचं गाणं . लताजींच्या आवाजातलं काव्य शिल्प ! दगडाच्या ,लाकडाच्या शिल्पना काळ झिजवून टाकेल ,पण हे शिल्प कालातीत आहे ! फक्त येणाऱ्या पिढीने ते जपून ठेवावे ,इतकीच तळमळ आहे . हे गाणं तस सर्वांसाठी आहे , पण जर तुम्ही वयाची साठी पार केली असेल तर —तर जरूर ऐका , कारण —–या गाण्याच्या सहा मिनिटा पुरते तरी तुम्ही चाळीस वर्षांनी तरुण व्हाल .

जाता जाता राग पहाडी वरील मला माहित असणारी काही गाणी

करवटे बदलती रहे आधी रात हम —–आपकी कसम
दिल पुकारे ,आरे आरे ——————–ज्युयेल थीफ
जो वादा किया ओ निभाना पडेगा ——ताज महाल
रहे ना रहे हम —————————-ममता

— सु र कुलकर्णी 

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..