नवीन लेखन...

त्या काजळ रात्री

त्या काजळ रात्री
पाऊस बरसत होता,
घन व्याकुळ मी अशी
श्वास तो कोंडत होता..
आरक्त डोळ्यांत अश्रूंचा
बांध आल्हाद साचला होता,
पापणी आड अश्रूंचा थेंब
मिटून हलकेच डोळ्यांत होता..
कळले होते मला अंतिम
श्वास माझे त्या वळणावरी,
जाणार हा देह सोडून
लांब दूर जग हे सोडुनी..
परी मन तयार न होते
त्या अंतिम कातर क्षणी,
देव देतो जन्म अन मृत्यू
ऋणानुबंध असतात उरुनी..
किती आठवणीत जीव
व्याकुळ भावुक होतो,
जाणारा अचानक जातो
जीव दुःखात हलकेच बुडतो..
जगरहाटी ही न चुकली
कुणाला जन्माला येउनी,
मरणं आहे अंतिम खरे
सत्य न चुकले कुणाला कधी..
मरणं वाटेवर ह्या असेल
मी ही अनामिक उभी,
कधी जाईल जीव क्षणात माझा
उरतील माघारी शब्दांची कहाणी..
ध्यास असतो शब्दांचा
कवी असतो काव्य जगुनी,
जन्म मरणाच्या फेऱ्यात या
काव्य राहते ओळख कवीची..
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..