नवीन लेखन...

निद्रिस्त ज्वालेचा अंगार फुलला

निद्रिस्त ज्वालेचा अंगार फुलला
कवितेचा जन्म कवी कल्पनेत साकारला
तमा न कसली न फिकीर कशाची
कवीच्या अंतरी नसते कमी शब्दांची
कवी मन असते वेगळे हळवे हृदयी
म्हणुनच सुचतात काव्यमाला कवी मनातुनी
वेदनांचे अंगार भावनांचा कोरडा बाजार पाहता
मोहरतात जाणिवा कवीच्या अलगद मनात तेव्हा
कुठलेही काव्य करतो कवी अंतरातुनी
शब्दांची मात्रा चालते कवीच्या श्वासातुनी
पेटतो दाह उडतात अनेक जळत्या ठिकऱ्या
कोमजते कवी मन न कळते कुणास कवी भावना
परी कवितेवर प्रेम करतो कवी शब्दातुनी जरा
इतरांच्या अव्यक्त भावनांना साकार करतो सदा
दुःखाचे उमाळे मनाचे करपणे भावना विरता
कवीच्याही आयुष्यात असतात अनेक वेदना
परी कवी निर्मितो शब्द सांधून काव्यांला
रसिकांना आनंद देतो कवी कवितेतून हलकासा
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..