नवीन लेखन...

विमर्श

मराठी साहित्यविषयक विविध मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह. त्यात महात्मा फुले यांची मराठी वाङमयाला देणगी, प्रा. वा. म. जोशी यांच्या तात्विक लेखनातून प्रकटणारी जीवनदृष्टी, साने गुरुजींचे निबंधखन, कला म्हणजे काय? वाङमयीन वादळ, गो.वि. करंदीकरांचे अॅिस्टॉटलच्या काव्यशास्त्रविषयक, सुखांतिका, अभिजात साहित्य आणि लोकप्रिय साहित्य, अनुभवामृताचे साक्षेपी विवेचन, र. धों. कर्वे प्रकल्पाची फलश्रुती, ज्योत्स्ना देवधर: एक सफल लेखनप्रवास, नाट्यदर्पणकार रामचंद्र […]

विभ्रम

मराठी वाङमयातील कविता, कादंबरी व आत्मचरित्र या तीन वाङमय प्रकाराचा तौलनिक आढावा डॉ.विलास खोले यांनी घेतला आहे. कवितांविषयी लिहिताना करूणाष्टके, स्वातंत्र्य शाहीर कुंजविहारी, प्रेम गौरव, भिजकीवही, द्रोण, संधिप्रकाशाचे लावण्य, तृतीय पुरुषाचे आगमन सारख्या प्रतिकात्मक काव्याचे सटीप विश्र्लेषण, तर कादंबरी या वाङमयाचा आढावा घेताना श्यामची आई, आस्तिक, बखर एका राजाची, गांधारी, किनारा, होमकुंड, भिन्न, विमु्क्ता यानंतर १९६० […]

शिक्षण समजून घेताना

बाहेरुन होते ती वाढ अन् आतून होतो तो विकास शिक्षणाने माणसाचा विकास अपेक्षित असतो. डॉ. नीता पांढरीपांडे यांनी बर्‍याच देशांना जर्मनी, स्पेन, फ्रान्स.. नेदरलॅंड, जपान, ऑस्ट्रेलिया, एथेंस, स्वित्झरलॅंड, सिंगापूर, थायलॅंड, मलेशिया या देशांना भेटी दिल्यात आणि त्याच्यातील शिक्षक तेथील शिक्षणपध्दतीशी तुलना करु लागला. आपल्या शिक्षणात काय कमी आहे? आपले विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी का जातात? या प्रश्नांनी […]

गाथा स्त्री शक्तीची

स्त्रीची ताकद तिच्या आत्मिक बळांत आहे. आत्मबळाचा शोध तिनं एकदा घेतला की मग ती कोणाचीच राहात नाही. सर्व प्रकारच्या परिस्थितींना सामावून घेत ती आयुष्याला नवं परिमाण देते. असंच आयुष्याला परिमाण देणार्‍या १३ स्त्रियांच्या अफाट कर्तृत्त्वाचा पट या पुस्तकाच्या रुपाने पुढे येत आहे. महिला सक्षमीकरण या सामाजिक प्रबोधनावर ही नभोनाट्ये आधारित आहेत. या सर्व नाटकांमध्ये एक सृजनशील […]

नुस्तं हसू नका !

विनोदी लेखाबरोबरच सामाजिक वर्तनाची खिल्ली उडवणारे लेख आहेत. काल्पनिक देवी-देवतांच्या उपासनेत आज बहुजन समाज परता अडकलेला आहे आणि पुजारीवर्ग हा देवाच्या नावावर बहुजनांकडून जमा केलेल्या धनावर जगत आहे. देशात नवनवीन मंदिर बांधण्याची स्पर्धा लागली आहे. राजकारण्यांपासून ते उद्योगपतीपर्यंत सर्वांनी या कार्यास योगदान देत आहे. मंदिर बांधण्यासाठी मजूर म्हणून बहुजन फुकटात सेवा देतो. राजकरणी व उद्योगपती भ्रष्टाचारातून […]

श्र्वास आणि इतर कथा

‘श्यामची आई’ या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ठ सिनेमाचा ‘कमळ’ पुरस्कार ‘श्र्वास’ या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची ‘श्र्वास’ ही कथा माधवी घारपुरेंची. श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्र्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह. श्र्वास आणि इतर कथा लेखिका : माधवी घारपुरे प्रकाशक : अनघा प्रकाशन, […]

फिल्मी चक्कर – सिनेसृष्टीत मारलेला फेरफटका

मराठी व हिंदी फिल्मजगतातील ज्येष्ठ व श्रेष्ठ पुरुष/स्त्री कलाकारंच्या परिचयातून त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्य दाखविण्याचा लेखकाचा प्रयत्न सफल झाला आहे. मोठे आर्टिस्ट असले तरी ते त्यांच्या सहवासातील छोट्या लोकांशी कसे मोठेपणा झुगारुन वागत याची खूप उदाहरणे पुस्तकात मिळतील.         फिल्मी चक्कर लेखक : रमेश उदारे प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व मूल्य : १३०/- […]

गर्भगिरीतील नाथपंथ

नाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची सुंदर चित्रे सविस्तर टिपण्यासह नाथपंथ, त्याचे तत्त्वज्ञान सामान्य माणसासाठी तयार केले आहे.   हरिश्र्चंद्रगडाजवळ, सह्याद्री पर्वतास पूर्व दिशेकडे जाणारा एक डोंगरफाटा फुटतो. नगर जिल्ह्यातून जाणार्‍या या डोंगररांगा बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या आंतरभागापर्यंत पसरलेल्या आहेत. यातील सोनई-बांबरी-जेउर-भिंगार (जि. नगर) ते चिंचोली-येवलवाडी (जि. बीड) या दरम्यानच्या सुमारे ११५ […]

हिमशिखरांच्या सहवासात

लेखक एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा छंद होता. पायी जात असताना निसर्गाचं रम्य दर्शन, बर्फाच्छादित शिखरं, वन्य प्राणी, विविध रंगाची फुलं, वनौषधीची झाडं यांचा त्यांना परिचय झाला. गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक स्थळांना भेट देताना त्याचे पुराणातील संदर्भ त्यांनी दिले आहेत. निसर्गाचं विराट रुप त्यांना सतत आकषिर्त करीत होतं तर जिम कार्बेटचं […]

राजा थिबा

मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. इंग्रजांना ब्रह्मदेशचा राजा थिबा याला रत्नागिरीला आणून स्थानबध्द केलं. राजाचा मोठा डामडौल होता. राण्यांवर तो खूप खर्च करावयाचा. आपल्या राहणीमानाला पूरक व्हावं म्हणून त्याने पोत्यांमधून जडजवाहिर बोटीत बसायच्या आधी टाकून घेतलं होतं. रत्नागिरीला आल्यावर जवळचे जडजवाहिर विकून ते आपला थाट करीत होते. रत्नागिरीला त्यांच्यासाठी ‘थिबा पॅलेस’ […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..