नवीन लेखन...

गोड स्वप्नं 

अजुनही एकांतात
कधी तिला आठवते
कोवळ्या त्या मनाचे
सुंदर गोड स्वप्न ते

त्याला पाहुन
तिचं मन झुरलं होतं
कळलं नव्हतं तिला
पण ह्रुदय हरवलं होतं

बसल्या बसल्या बोटानं
वहीत रेषा ओढत होती
स्वतःच्या नावापुढे
त्याच नाव जोडत होती

झुरलेल मन तिचं
शब्द शोधत होतं
भावनां व्यक्त करण्यास
बळ शोधत होतं

ओठांवरच्या शब्दांना
कंठ नाहीच फूटला
हळुहळू मोगऱ्याचा
तो बहरही ओसरला

अल्पायुषी भावना ती
अशी झुरता मेली
रेंगाळलेल्या पावलांनी
बोहल्यावर ती चढली

दूर राहिलेल्या वाटेसाठी
मन नाही अडखळलं
वास्तवाच्या हिरवळीवर
अगदी आनंदान रमलं

अजूनही एकांतात
कधी तिला आठवते
पडलेले गोड स्वप्न ते
हसुन झटकून टाकते.

डॉ.सुभाष कटकदौंड

डॉ. सुभाष कटकदौंड
About डॉ. सुभाष कटकदौंड 25 Articles
डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. "भिंतींना ही कान नाहीत" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..