नवीन लेखन...

सुवासिनीचा पाडवा

दिवाळीच्या पाडव्याचा दिस आज आला बाई
घालते सडा अंगणात धन्याची मी वाट पाही ।
लावीते पणती मी दारी केली बघा रोषणाई
फुलला दारीचा मोगरा फुलली हो जाई जुई ।
किती दिस झाले बघा धन्याची माझ्या भेट नाही
करण्या रक्षण देशाचे धनी माझा सैनिक होई ।
ऊन वारा पाऊस तर कधी बर्फ वृष्टी होई
नाही विश्रांती कधी त्यास मन कासावीस होई ।
वाट पाहता धन्याची डोळे माझे ओले होई
लावता सुगंधी तेल शीण त्याचा जाईल बाई ।
लाऊनी ऊटणे सुवासीक त्यासी न्हाऊ घालीन मी
घालता अंघोळ माझ्या राया जीव वेडावून जाई ।
दोन डोळ्यांची निरांजने करती ग औक्षण बाई
करी रक्षण कुंकवाचे हेच मागणे ग अंबाबाई ।
व्हावे कल्याण सर्वांचे नाही मागणे माझे काही
घरधनी व्हावा सुखी हीच ओवाळणी मला देई ।

सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
८ नोव्हेंबर २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..