नवीन लेखन...

संगीत सुर्य

गदीमा आणी बाबुजींनंतर
रामायणातील गीत संपले
भावमधुर त्या भावगीतातील
भावनांचे अस्तित्व संपले ।

बाबुजीं नंतर पुन्हा एकदा
भावगीत ते स्तब्ध जाहले
देण्या संगीत स्वर्गलोकी
संगीतसुर्य यशवंत निघाले ।

संवादिनी ती तानपुऱ्यासह
आज अश्रु ढाळीत आहे
ताल हरवलाय आज तबल्याचा
विणा सरस्वतीची अबोल आहे ।

भाव मराठी भावगीतातील
आज गेले आहेत हरवूनी
गायकांच्या मधूर गळ्यातील
सूरही आज बसले रुसूनी ।

वाटते त्या संगीत सुर्यांनी
जन्म घ्यावा येथे फिरुनी
पुन्हा एकदा सजवावी मैफील
गंधर्व लोकीच्या त्या सप्तस्वरांनी ।

— सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
३० आक्टोंबर २०१८

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..