नवीन लेखन...

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १०

शरीरं कलत्रं सुतं बन्धुवर्गम्
वयस्यं धनं सद्म भृत्यं भुवं च ।
समस्तं परित्यज्य हा कष्टमॆकॊ
गमिष्यामि दुःखॆन दूरं किलाहम् ॥ १० ॥

भगवान श्री वैकुंठनाथांच्या कृपा प्रसादासाठी प्रार्थना करणारे आचार्य श्री येथून पुढे दोन-तीन श्लोकात एक वेगळाच विचार आपल्या समोर ठेवत आहेत.
केवळ शब्दार्थ घेऊन हा श्लोक स्फूट स्वरूपात म्हणजे एकटा, सुटा वाचला तर काहीच अर्थबोध होणार नाही.

आरंभी तो शब्दार्थ पाहू, आचार्य श्री म्हणतात,

शरीरं – माझे अत्यंत आवडते शरीर.
कलत्रं – जिच्या सोबत संसार केला ती पत्नी.
सुतं – ज्यांच्यावर कायम प्रेम केले ते पुत्र, संतती.
बन्धुवर्गम् – ज्यांच्या सोबत आयुष्यभर विविध सूखे भोगली ते आप्तस्वकीय.
वयस्यं – बंधुवत् प्रेम केलेले मित्र.
धनं – आयुष्यभर प्रचंड प्रयत्न करून मिळवलेला पैसा.
सद्म – अफाट कष्ट करून स्वप्न पहात बांधलेले घर.
भृत्यं – नोकर चाकर , सेवेकरी.
भुवं च – असा हा संपूर्ण संसार.
समस्तं परित्यज्य – या सगळ्यांना सोडून.
हा कष्टम् – अत्यंत कष्टाने
एको गमिष्यामि दुःखॆन दूरं किलाहम् – दुःख अपूर्ण अवस्थेत मी एकटाच दूर जाईल का?
आता असा शब्दार्थ वाचला तर याच भगवान विष्णूंचा संबंध कुठेच दिसत नाही.
हे एखाद्या पराधीन, दुःखी जीवाचे आत्मचरित्र वाटते.
पण हे सांगताना आचार्य सुचवत आहेत की ज्यांच्या आयुष्यात भगवंताची कृपा नसते त्यांच्या आयुष्यात आलेल्या या सगळ्या गोष्टींना सोडून जाताना त्यांना अत्यंत दुःख होते.
यापैकी काहीही शेवटी त्याला सोबत येत नाही. शेवटी सोबत फक्त भगवंताची कृपाच असते.
यासाठी त्या भगवंताला नमस्कार असो.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 412 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..