नवीन लेखन...

सर्वसामान्यांचा जीवनोत्सव

सोलापुरात असताना आधी “रजनीगंधा ” आणि नंतर ” छोटी सी बात ” पाहिला. मध्यम वर्गीय प्रमुख पात्रे – विद्या आणि अमोल ! बसने प्रवास वगैरे करणारे, कपडेलत्तेही आपल्यासारखे . धर्मेंद्र आणि हेमाच्या सिनेमाला (आपल्यासारख्या आवडीने) जाणारे आणि त्यांच्या जागी स्वतःला कल्पणारे.

नुक्तीच दयानंद कॉलेजच्या दहलजीवर पाय ठेवलेले आम्ही. तारुण्याचा असा वावर आवडून गेला- नकळत आजूबाजूला बघण्यास प्रवृत्त करून गेला.
चक्क आपल्यासारख्यांवर इतके ताजे, सोपे, रोजच्या रुटीनमधील सिनेमे निघू शकतात? हे सगळं इतकं जवळून पाहिलं असेल या माणसाने? आपले जीवन उत्सवाच्या आसपास जाण्याच्या लायकीचे असते?

बासू चॅटर्जी तेव्हापासून आवडायला लागले. त्यांचा प्रत्येक चित्रपट न चुकता पाहिला. थबकलो मात्र ” एक रुका हुआ फ़ैसला ” पाशी. माध्यमाची आणि दिग्दर्शकाची ताकद जाणवली. या व्यक्तीला इतक्या लाइटली घ्यायला नको हे जाणवलं. मराठीतल्या ” शांतता कोर्ट —- ” च्या आसपास जाणारा ! विवेकबुद्धी (लॉजिक ) चा अत्यंत सुंदर वापर करणारा.

त्यांच्या आणि त्यांच्या सारख्यांच्या काळाला ओलांडून आपण बरेच पुढे आलो. कदाचित आता तसे चित्रपट बनणार नाहीत. नेटफ्लिक्स आणि तत्सम प्रसारणांना ते पचणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींमधून खरं आयुष्य भिडविण्याचं सामर्थ्य आता कालबाह्य झालंय. सरकारी अथवा बँकांमधील कारकून कधी प्रेमात पडतात का? हृषीकेश मुखर्जी याच पठडीतले. जगणं इतकं अवघड नसतं हे गालातल्या गालात हसत सांगून पटवून देणारे !

अशांना आता अलविदा केलेलंच बरं ! सध्या हिंस्त्र, अंगावर येणारे, न बघवणारे चित्रपट असतात. तेच बघावेत.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..