नवीन लेखन...

सब घोडे बारा टक्के

उतलो नाही मातलो नाही
कर्तव्याला चुकलो नाही ।
तरीही लढणं अटळ आहे
अटळ आहेत धक्के।
नियतीच्या खेळात
सब घोडे बारा टक्के।।ध्रु।।

नियतीची एकच चाल
दुनिया सगळी बेहाल
जमिनीवर आले सितारे
बंदी झाले देव-देव्हारे
कोण राहील कोण जाईल
कुणा न ठाऊक पक्के ।
नियतीच्या खेळात
सब घोडे बारा टक्के ।।१।।

नियतीला हवेत जसे
पडतील फासे तसे तसे
राजा, वजीर, त्यांचे मोहरे
लढत राहतील सारे
म्हणतील आहेत हातात
अजून सारे एक्के ।
नियतीच्या खेळात
सब घोडे बारा टक्के ।।२।।

खेळ संपता संपत नाही
जोवर नियती मानत नाही
तिची हर एक चाल अवघड
आपली? बचावाची धडपड
सुटलो आता म्हणता उरतो
होऊन हक्केबक्के ।।३।।

नियतीच्या खेळात
सब घोडे बारा टक्के ।।

….मी मानसी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..