नवीन लेखन...

रुसल्या त्या आठवणी 

पूर्वीच ते घर कसं
जायचं अगदी गजबजून
गप्पांच्या त्या मैफलीत
आठवणी यायच्या धावून.

आता कसं सर्व काही
शांत अन् निवांत आहे
पण, आठवणींच्या आठवणींने
मन थोडसं अशांत आहे.

पूर्वी आठवणी कशा
अगदी मनमोकळ्या हसत
सवय नव्हती त्यांना
अन् नव्हत्या कधी रुसत.

आठवणी पूर्वी कशा
रहायच्या सदैव बोलत
कुजबूजतात कधिमधी
आणि बसतात आता झूरत.

भिजतात काही आठवणी
अन् ओल्या होतात आतनं
बसतो उमेदीच्या ऊन्हात
सुकवण्याचा एक प्रयत्न.

पूर्वी आठवणींची फुलपाखरं
कशी स्वछंदी बाडगळत
आता काही सैराट भुंगे
बसतात मन पोखरत.

पूर्वी आठवणी कशा
प्रेमानं थोपटुन निजवत
आता मात्र उदास बसतात
रात्र रात्र उगाच जागवत.

पूर्वी आठवणींच्या झाडाखाली
थंड मंद वारा वाही
आता मात्र मनाच्या वळचणीला
पूर्वीसारखा थारा नाही.

– डॉ.सुभाष कटकदौंड

डॉ. सुभाष कटकदौंड
About डॉ. सुभाष कटकदौंड 25 Articles
डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. "भिंतींना ही कान नाहीत" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..