नवीन लेखन...

पुनर्निर्मिती ( रीक्रीएशन ) !

“सकाळ ” उघडला आणि आनंददायी वृत्त वाचले – ” अमेरिकन कवयित्रीला साहित्याचे नोबेल पारितोषिक ! “
चक्क काव्य या साहित्य प्रकाराला सर्वोच्च सन्मान !
मग मनात विचार आला काव्य/साहित्य /कला /नृत्य/ चित्रे/शिल्पे अशा सगळ्याच “निर्मिती ” मुळातूनच प्रतिनिर्मिती असतात. निर्मिती एकच असते- निसर्ग ! आणि निसर्गाचा निर्माता विविध नावा /रूपांनी ओळखला जातो. आख्खा निसर्ग आपण विविध माध्यमांमधून पुनर्निर्मित करीत असतो. लताचे स्वर्गीय सूर आपले रिऍलिटी शोज री क्रिएट करीत असतात. गुरुही आपल्या शिष्यांच्या माध्यमातून स्वतःला पुनर्निर्मित करीत असतो.
मूळ /अस्सल आणि त्याची प्रतिकृती यांच्यात फरक असणारच. प्रतिकृती कितपत मुळांच्या जवळ जाण्यात यशस्वी होतात यांवर आपली दाद किंवा नापसंती अवलंबून असते.
एका पिढीला मूळ घरंदाज ऐकायला / पाहायला / अनुभवायला मिळते आणि तिच्या पुढच्या पिढीला मात्र पुनर्निर्मित आविष्कारांवर तहान भागवावी लागते. अवशेषांवरून मूळ बांधकामांची कल्पना करावी लागते.
चिरंतनाकडे जाण्याची ओढ असावी म्हणजे अस्सल भेटत जातं.
काल वाचलं – ” चांदनी ” चित्रपट री क्रिएट करण्यात आलाय. त्यांत मूळची बबली ” श्रीदेवी “, पारंपरिक प्रियकराची अनुवंशिकता घेऊन आलेला ” ऋषी ” असेल का? ” शिव-हरी ” चं स्वर्गीय आणि नादमधुर संगीत ऐकायला मिळेल कां ? ” मुघले आझम ” आणि “नया दौर ” ची रंगीत रूपे ( काळाची गरज म्हणून तंत्रज्ञान वापरून) री क्रिएट जरूर करण्यात आली. पण मजा नहीं आया !
सकाळी सकाळी उठल्यावर नातीला बासरीवरील एका स्त्री कलावंताची एक पहाडी धून ऐकविली. ती पटकन म्हणाली –
” कृष्ण बाप्पाचीच बासरी जास्त गोड असते. “
सदर लेखन सुचण्याचं आणखी एक कारण – तिचे हे वाक्य !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..