नवीन लेखन...

अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर

हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५७ रोजी मुंबई येथे झाला.

महेश मांजरेकर यांनी आपल्या करीयर सुरुवात १९८४ साली ‘अफलातून’ ह्या मराठी नाटकामधून केली. दिग्दर्शक म्हणुन त्यांनी १९९५ साली ’आई’ या मराठी चित्रपटापासून सुरुवात केली. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम दिग्दर्शकचे फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. १९९९ साली त्यांनी ’वास्तव’ चित्रपटाचे दिग्दर्शक केले. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वोत्तम चित्रपट ठरला. पण त्यानंतर दिग्दर्शक केलेले निदान आणि जिस देश मे गंगा रहता है हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तेवढे यशस्वी ठरले नाहीत. त्यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट अस्तित्व, कुरुक्षेत्र, एहसास, हत्यार, विरुद्ध असे आहेत. २००१ साली एहसास या चित्रपटापासुन त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. २००२ साली ’कांटे’ चित्रपटातील त्यांची भुमिका गाजली. पुढे त्यांनी प्राण जाये पर शान न जाये, रन, मुसाफिर, पदमश्री लालू प्रसाद यादव, जवानी-दिवानी, दस कहानिंया, स्लमडॉग मिलेनियम, वाँटेड, दबंगसारख्या अश्या चित्रपटात विविध भुमिका सकारुन आपल्या अभिनयाची चुणुक दाखविली.

त्यांनी लेखन व भुमिका केलेला ’मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ हा मराठी चित्रपट तुफान गाजला. त्यानंतर त्यांनी ”शिक्षणाच्या आईचा घो”, ”लालबाग परळ”, ”फक्त लढ म्हणा”, ”काकस्पर्श” आणि ”कोकणस्थ” या चित्रपटांचे दिग्दर्शन करून मराठी चित्रपटाच्या प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करण्याची महत्वाची कामगिरी केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला काकस्पर्श, नटसम्राट यांसारख्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..