नवीन लेखन...

निमित्त

व्हिडिओतील ‘ ते ‘ आणि आपण …!

अतर्क्य घटनांनी मन सुन्न होण्याचे दिवस आले आहेत असं हल्ली सारखं वाटत राहतं .

गोष्ट कालची .

सोशल मीडियावर रेंगाळत असताना दोन व्हिडीओ पाहण्यात आले . दोन छायाचित्रे पाहण्यात आली .

आता यात अतर्क्य काय असं कुणालाही वाटेल . रोज शेकडो व्हिडीओ आणि हजारो छायाचित्रे सोशल मीडियावर धुमाकूळ असतात . त्यापैकी हे व्हिडीओ , छायाचित्रे असतील असं वाटत असेल तर ते तसं नाही .

कारण आता मी जे सांगणार आहे ते वाचून संवेदनशील असाल तर तुम्हीही अस्वस्थ व्हाल , तुमचं अंतर्मन ढवळून निघेल आणि कदाचित अंतर्मुख व्हाल .

एक छायाचित्र होतं :
झोपडीजवळ अपुऱ्या कपड्यातील एक लहान मुलगा , काहीतरी अपूर्व पहायला मिळाल्याच्या आनंदात समोर उभ्या असलेल्या सैनिकाला सॅल्युट करतो आहे . आणि समोरचा लष्करी जवान उत्सुकतेनं त्याच्याकडे पाहतो आहे .

दुसरं छायाचित्र होतं :
-५० अंश इतक्या हवामानात सीमेचं रक्षण करणारा जवान काही क्षणापुरता विश्रांती घ्यायला बसला आहे आणि बूट काढल्यानंतरचे त्याचे प्रचंड भेगाळलेले , सुजलेले तळवे असूनही चेहऱ्यावर आत्मिक समाधान आहे . होणाऱ्या वेदना त्यात झाकल्या गेल्या आहेत .

एक व्हिडिओ :
सुशिक्षित आणि मॉडर्न स्त्री , लष्करातील एका जवानाला थोबाडून काढताना दिसत आहे .
त्याचा गुन्हा काय , तर अडथळ्याच्या रस्त्यावर त्या स्त्रीला त्याने ओव्हरटेक करू दिले नाही , तिची गाडी पुढे येऊ दिली नाही याचा राग येऊन ती स्त्री त्या जवानाला मारत होती . बाकीचे जवान तिची समजूत काढत असताना ती बेमुवर्तपणे निघून जात होती .

आणखी एक व्हिडिओ :
शाळेतील लहान मुल शिस्तीत उभी आहेत . त्यांच्या हातात , त्यांच्या गावातील अठरा वर्षांपूर्वी शहीद झालेल्या जवानाला श्रद्धांजली वाहणारा बॅनर आहे . इतक्यात नऊवारी साडी नेसलेली , वय झाल्यानं कमरेत वाकलेली एक म्हातारी, त्यांना थांबवते .बॅनर वरील जवानाच्या छायाचित्राला पाण्याने धुवून पुसून काढते आणि त्याची पूजा करून निरांजन ओवाळते .

अस्वस्थ झाला असाल ना ?

काल दिवसभर मीसुद्धा त्या दोन छायाचित्रांमुळे आणि व्हिडिओमुळे अस्वस्थ झालो होतो .

निरागस मुलाना जे समजतं ,
आयुष्य संपत आल्याची जाणीव बाजूला ठेवून ,सीमेचे रक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या जवानाला श्रद्धांजली वाहणाऱ्या त्या खेडेगावातील म्हातारीला जे समजतं,
ते त्या स्मार्ट दिसणाऱ्या स्त्रीला का समजलं नाही ?

वेग महत्वाचा ? पुढे जाण्याची भ्रामक प्रतिष्ठा महत्वाची ? की समजूतदारपणा दाखवून जवानांना पुढे जाण्यासाठी दिलेला सन्मान महत्वाचा ?

सगळं अतर्क्य वाटतं मित्रानो .

रेल्वेत पत्ते खेळण्यासाठी जागा अडवून बसलेल्या तरुणांना , शेजारी खूप समान सांभाळत उभा असलेला, अवघडलेला लष्करी जवान का जाणवत नाही ?
पूरपरिस्थितीत मदत करणाऱ्या जवानाला आपणही मदत करावी असं व्हिडीओ करणाऱ्यांना का वाटत नाही ?
भूकंपामुळे होणाऱ्या पडझडीत मदत करणारे , नैसर्गिक आपत्तीत धावून येणारे , वेळ येताच कसल्याही हवामानाची पर्वा न करता सीमेचं रक्षण करायला धावून जाणारे सैनिक आपल्या खिजगणतीत का नसतात ?
त्यांच्या बद्दल , त्यांच्या कुटुंबियांबद्दल आपल्या हृदयातला एक कोपरा जपून का ठेवत नाही ?

या प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला माहीत असतात .
ती उत्तरं सतत सजग राहावीत म्हणून या अतर्क्यतेचा प्रपंच !

खरं म्हणजे छायाचित्रं किंवा व्हिडीओचं वर्णन करताना मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला कळलंय .
खरं ना ?
चला तर , एक संवेदना जागवूया आपल्या प्राणप्रिय सैनिकांसाठी ! ?
———–
डॉ. श्रीकृष्ण जोशी ,

रत्नागिरी .
———–
नावासह शेअर करायला हरकत नाही .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

1 Comment on निमित्त

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..