नवीन लेखन...

नारायण भंडारीचं काय झालं ? – भाग ४

मीसुद्धा काळजीत होतो .
खूप दिवसात नारायण दिसला नव्हता .
अनेक जण विचारणा करीत होते .
त्यांना मी उत्तर देऊ शकत नव्हतो .
कारण नारायणाचा पत्ता मलाच मिळत नव्हता .
तो कुठे गायब झाला , काहीच कळत नव्हतं .
रोज बारकाईनं वर्तमानपत्रं चाळत होतो .
मराठी न्यूज चॅनल्स जाहिरातीसह पहात होतो .
खोटं कशाला सांगू , पण एकदा खाडीची दलदल सुद्धा बघून आलो .
पण त्याचा मागमूस लागत नव्हता .

आणि अचानक मला नारायण दिसला . चहाच्या टपरीवर कटींग मारत होता .
मी क्षणाचाही विचार न करता त्याचा हात पकडला आणि बाजूच्या बाकड्यावर बसायला घेऊन गेलो .

अन्य काही विचारायच्या आत तोच म्हणाला …
” मी कुठे होतो म्हणून विचारायचं असेल , तर आधीच सांगतो माझं डोकं पार कामातून गेलंय . शेतकरी आंदोलनाच्या इथं मी गेलो होतो आणि तिथे जे काही पाहिलं त्यानं माझं डोकं फिरलंय . अरे तुम्हाला काही कल्पना आहे , तिथे काय चाललंय ते ? तिथे रस्त्यालगत आणि जवळपास पक्की बांधकामं चालू आहेत , पावसाळ्यात आंदोलन सुरू ठेवण्यासाठी . अगदी राजरोसपणे , बेकायदेशीरपणे . नवं गाव वसवल्यागत चालू आहे . आणि कुणाचंही लक्ष नाहीय बहुधा . कुठल्याही पत्रकाराला , न्यूज चॅनल्सवरच्या वार्ताहराला दखल घ्यावीशी वाटत नाही . भविष्यात काय होईल याची कुणाला तमा नाही . अरे काय चाललंय काय . तिकडे सीमेवर भुयारं खणून राजरोसपणे अतिरेकी भारतात येण्याचा प्रयत्न करताहेत . आपलं लष्कर सावध आहे म्हणून आपण जिवंत आहोत , सुरक्षित आहोत . पण अतिरेक्यांना ही रस्त्यालगतची बांधकामं वरदान ठरू शकतात , हे कळत कसं नाही कुणाला ? आपण भारतवासीय कुठल्या बातम्या पाहतोय , ऐकतोय . लाज कशी वाटत नाही . एवढे कसे सगळे षंढ झालेत . की काहीतरी वाईट घडण्याची वाट पाहत आहात . अरे सुधरा रे , नाहीतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल . ते लष्कर , ते पोलीस कुठे कुठे पुरे पडतील ?आपलं काही कर्तव्य आहे की नाही ? ”
तो प्रचंड संतापानं बोलत होता .

मी त्याच्याकडे बघत राहिलो .
आणि डोळ्यासमोर न्यूज चॅनल्सचे पडदे आले ..
कोरोना , परदेशातील बातम्या , व्हायरल व्हिडिओचा तपास , राजकारण , क्षुल्लक गोष्टींवरच्या चर्चा या व्यतिरिक्त भारतीयांना दुसरं जीवन नसावं असं सगळं चित्रण माथी मारलं जात होतं आणि देशापुढचा धोका जनतेसमोर येऊ दिला जात नव्हता .

नारायणाचं बरोबर होतं .
मी त्याला काही विचारण्यासाठी तोंड उघडलं.
आणि गप्प बसलो .
मला विचारात गुंतवून नारायण पुन्हा नाहीसा झाला होता …

मी डोक्याला हात लावला आणि तोंडावर मास्क लावून शांतपणे घरी आलो …

मित्रांनो ,
मास्क लावा .
सामाजिक अंतर ठेवा .
हात सतत धूत राहा .
लस अवश्य घ्या .
नारायणासारखा देशहिताचा विचार करा .

( क्रमशः )
( पूर्णतः काल्पनिक .)

— डॉ. श्रीकृष्ण जोशी

ही सोमि सिरीज ( सोशल मिडिया सिरीज ) नावासह सर्वत्र पाठवायला हरकत नाही.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 109 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..