नवीन लेखन...

नाही म्हणजे नाही !

No Means No

पिंक . अलीकडेच प्रदर्शित झालेला हिन्दी सिनेमा . दाहक वास्तवावर आधारित तितकाच वास्तव सिनेमा . आपण व्यक्ति म्हणून , समाज म्हणून जर असन्वेदनशील झालो तर एक संवेदनशील विषय किती ज्वलंत बनू शकतो , नव्हेबनलाच आहे , याचा आरसा म्हणजे हा सिनेमा . करमणूक म्हणून जायचे असेल तर या सिनेमाला जाण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये असा हा सिनेमा . पण आपल्या आयुष्यात एक व्यक्ति म्हणून , एक समाजाचा घटक म्हणून , एकवडील म्हणून , एक मित्र म्हणून , एक मैत्रीण म्हणून , एक समाज – धुरीण म्हणून , एक सहकारी म्हणून कसे वागतो आणि कसे वागले पाहिजे याबाबत एकदम झनझनित अंजन घालणारा असाच हा सिनेमा आहे . एकदम अस्वस्थ करणारा .

त्यासाठी या सिनेमाच्या निर्मितीशी संबंधीत सर्वांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजे . पण निव्वळ अभिनंदन करून आपल्या सगळ्यांच्याच नेहमीच्या सवयीने सोडून देण्यासारखी ही गोष्ट नाहीच .

हा सिनेमा पाहिल्यापासून माझ्या मनात एकच विचार सतत येत आहे कि सभ्यतेच्या साऱ्या गोष्टी आज अशा पध्दतीने परत एकदा तपासून घेण्याची आज वेळ आली आहे . जर आपल्या लेकी- सुनान्बाबत आपण इतके नादान पणे वागणारअसू , तर आपल्यात आणि ” लड़के है , जवानी में तो ऐसा एखाद बर्ताव हो जाता है ” असं म्हणणारया आपल्या देशातील एका राजकीय नेत्यांत आणि तशा मनोव्रुत्तीच्या इतरांत काय फरक राहिला ?

असा फरक राहिला पाहीजे आणि तो प्रकर्षाने सतत जाणवत राहिला पाहीजे असं अगदी मनापासून वाटणार्या सर्वानी हा सिनेमा पाहिलाच पाहिजे . आणि त्याचबरोबर या सिनेमातील तीन तरूण मुलिन्वर जो प्रसंग येतो , तसा प्रसंगकोणावरही येणार नाही याचीही व्यवस्था आपण सगळेच मिळून कार्यरत ठेवणे आवश्यक आहे . ( नुसती सुरू करणे नाही ; सुरू ठेवणे अत्यावश्यक . )

अर्थात असा विचार , असा व्यवहार केवळ या सिनेमातील घटने बाबत नाही तर आपल्या आयुष्याच्या अनेक पैलूंबाबत करण्याची वेळ आली आहे . आपला देश आर्थिक महासत्ता बनेल किंवा बनणार नाही . पण आर्थिक महासत्ता होणे हाकाही सर्व व्यथा दूर करणारा सार्वकालिक रामबाण उपाय नाही . एकीकडे सांस्कृतिक सम्रुध्धीच्या परंपरेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे एक देश म्हणून Human Development Index मधे जागतिक क्रमवारीत खालच्या पातळीवरअसायचे हे एक देश म्हणून शरमेचीच बाब आहे . अर्थात त्यासाठी फक्त सरकारला दोषी मानने सर्वथैव गैर आहे .

मग याबाबतीत कसे वागावे लागेल याचे आदर्श उदाहरण म्हणजे ” PINK ” सिनेमातील अमिताभ बच्चन यांनी रंगवलेली दीपक सेहगल ही व्यक्तिरेखा . आपल्या अवती – भवती घडणाऱ्या घटनांची नोंद कशी घेतली पाहिजे , संबंधितव्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात गैरवाजवी ढवळाढवळ न करता त्यांना कसे सहाय्यकारी झाले पाहिजे , तटस्थता आणि समरसता यात संतुलन कसे राखले पाहीजे , त्याचवेळी असॆ सामाजिक आयुष्य आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातीलजबाबदार्या यांचा तोल कसा सांभाळत राहीले पाहीजे , कायद्यासमोर दोषी व्यक्तींना उघडे पाडत असतानाच एकंदरीतच प्रचलित पध्दतीत कसे – काय – का बदल झाले पाहिजेत याचे दिशा – दिग्दर्शन करणे ( मग ते या सिनेमा प्रमाणेतिरकस , खोचक , कुचकट पणे ही का असेना ) याचे काळानुसार , प्रसन्गानुरूप , स्थितिसापेक्ष असॆ हे उत्कृष्ट उदाहरण आहे .

या अर्थाने या सिनेमाच्या शेवटी तीन मुलिन्चा वकील म्हणून खटल्यातील Closing Remarks म्हणून अमिताभ बच्चन यांच्या तोंडी जो संवाद आहे तो फार महत्वाचा आहे . तो संवाद असा ” No Means No . No हा केवळ एक शब्दनाहि . नाहीच . ते ऐक संपूर्ण वाक्य आहे . त्याला आणखी वेगळ्या व्याख्येची , माहितीची , स्पष्टीकरणाची आवश्यकता नाही . ”

तसे या आशयाचे मुद्दे कायद्याचा अभ्यास करतांना शिकवले जातात . विशेषतः Criminal LAW शिकताना . वाढत्या वैयक्तिक वयात , आयुष्यात त्याचे नानाविध पैलू लक्षात येत राहतात .

अगदी गुंतवणूक क्षेत्राबाबत ही .

तसेही या सिनेमाचे नाव ” पिंक ” आणि गुंतवणूक क्षेत्राविषयी जास्त विस्ताराने देणाऱ्या आर्थिक नियतकालिकांना म्हणतात ” पिंक पेपर्स ” .

असो .

आणि मग तसा विचार करत असताना गुंतवणूक आणि हा सिनेमा यांची सांगड घालणारे काही मुद्दे मनात उमटू , उमलू लागले .

यातला पहिला पैलू म्हणजे NO MEANS NO हे वाक्य . आपल्या गुंतवणूकीचे तंत्र आणि मंत्र मनात घोटवत असताना आपण मोहाला , लोभाला , पुर्वग्रहाना हे म्हणतो का ? कोणतीही परिस्थिती असली तरी आपल्या गुंतवणूकीच्यासातत्याला तात्पुरतीही सोडचिठ्ठी देण्यास पुरेशा क्रुतिशील ठामपणे NO MEANS NO म्हणायला शिकणार् ना ?

यालाही काही वेगळे स्पष्टीकरण देण्याची थोडीही आवश्यकता नाही .

याचा असाच ऐक पैलू म्हणजे गुंतवणूक ही सदासर्वकाळ सर्वान्चीच गरज असते . महिला आणि अल्पवयीन यान्च्याबाबत तर असतेच असते . हल्लीच्या काळात महिला त्यांच्या स्वतःच्या गुंतवणुकीबाबत ही खबरदारी , जबाबदारी , काळजीस्वतःच घेउ शकतात . जिथे ही परिस्थिती नसेल तिथे ही भूमिका घरातील इतरांनी निष्ठापूर्वक , नेकिने पार पाडली पाहिजे . घरातील अल्पवयीन व्यकिन्बाबत तर ही गोष्ट घडलीच पाहिजे . जिथे हे होत नसेल तिथे हे त्यांच्या परिचितानीस्वयन्स्फुर्तिने केले पाहिजे . निदान त्याची आवश्यकता आणि प्रक्रिया लक्षात आणून तरी दिली पाहिजे . कारण त्याबाबतची माहिती सर्वाना च असतेच असॆ नाही . आणि अगदी असली तरी काहीवेळा परिस्थितीच्या रेटयात ते सुचतेच असॆनाही . जसे या सिनेमात तीन मुलिन्बाबत अमिताभ बच्चन एक वकील म्हणून करतो . हा संदर्भ केवळ ध्वन्यार्थाने नाही तर सर्वार्थाने लक्षात घेतले कि या सिनेमातील एक संवाद ( जी कायदेशीर तरतूद आहे ) आहे कि ” Non – Bailable Warrant असले तरी महिला आणि बालकांना bail मिळतो , मिळू शकतो .” मात्र ही प्रक्रिया योग्य तर्हेने आणि वेळीच सुरू करावी लागते . कारण यातूनच त्यांची निर्भरता निर्माण होत असते . हे आर्थिक , भावनिक , सामाजिक आशाअनेक छ्टांनी खरे आहे .

पिंक हा सिनेमा आणि गुंतवणूक क्षेत्र यांची सांगड घालताना मला जाणवलेला तिसरा पैलूं म्हणजे या दोन्ही गोष्टींचा एक समान संदेश हा आहे कि जर आपण बरोबर असू , निर्दोष असू तर आजूबाजूच्यानी , ज्यांचा तुमच्या परिस्थितीशीएरवी काहीही संबध नाही , केलेल्या टिप्पणीकडे फार लक्ष देण्याची जरासुध्धा आवश्यकता नाहि . त्यामुळे विचलित होण्याची तर बिलकूल गरज नाही . उलट त्यामुळे स्वतःच्या मनाशी स्वतःच्या मताची , तत्वान्ची , आचरणची तपासणी ,उजळणी करून घ्यावी . या सिनेमात ऐक प्रसंग आहे ज्यात अमिताभ बच्चन तापसी पन्नू च्या overcoat चे hood तिच्या डोक्यावरून काढतो . ते दोघं मॉर्निंग वॉक ला गेलेले असतात . ती नेहमीच्या प्रमाणे चालत असते . तिला पाहून “अरे ही तर ती कोर्ट केस वाली ” असॆ एक जण म्हणतो . ते ऐकून सिनेमातील मिनल अरोरा ( तापसी पन्नों ) पटकन हुड डोक्यावर घेतें . अमिताभ बच्चन तें पटकन तिच्या डोक्यावरुन काढतात . हे अनेक अर्थांनी महत्वाचे आहे . निर्दोषव्यक्तीचा स्वाभिमान – आत्म सन्मान म्हणून तर ते महत्वाचे आहेच , पण तितकेच ते कार्यपद्धतीचे निर्देशक आहे . सातत्याने केलेली गुंतवणूक विपरीत परिस्थितीत तुमच्यावर छत्र धरते आणि त्यामुळे सामाजिक टीका – टिप्पणी पासूनस्वतःला लपवण्याची वेळ येत नाही .

या सिनेमात न्यायाधीश महाराजांचे नाव ” सत्यजित दत्त ” आहे हेही यासंदर्भात काहीवेळा अतिशय सूचक वाटायला लागते .

पिंक हा सिनेमा पाहताना जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे या सिनेमात अन्द्रिया या भूमिकेतून तिने केलेले एक वक्तव्य . ती कोर्टात सांगते कि ” पुर्वान्चल ( North – East ) मधील मुलींबद्दल निष्कारण वेगळ्या आणि वाईट नजरेनेपाहिले जाते . ” गेल्या काही काळात दिल्लीत त्यांच्या बाबत ज्या घटना घडत आहेत त्या हीच गोष्ट सिध्द करत आहेत . काही वर्षांपूर्वी आलेल्या शाहरुखखानच्या ” चक दे इंडिया ” मधे हॉटेल मधे घडणाऱ्या प्रसंगातही याची झलक होतीचकी ! अशा मुळे त्या निरागस व्यक्तींच्या मनात आपण काय प्रतिमा निर्माण करत असतो ! गेली सहा वर्षे ऑफीस टूर मुळे माझे अनेकदा पुर्वान्चल मधे जाणे होत असते . तेन्व्हाही हे मला प्रकर्षाने जाणवत असते . त्या सात राज्यांच्यावाढत्या विकासाचा भार प्रामुख्याने तिथल्या महिला वाहात असतात हे प्रत्येकाने सतत स्मरणात ठेवणे आवश्यक आहे . मोजक्याच उठवळ , उच्रुन्खल , नादान , हलकट माणसांमुळे संपूर्ण सज्जन सरळमार्गी समाजाला वेठीस धरण कधीचयोग्य नाहि . हा केवळ त्या भूभागातील मुलींना भेडसावत असलेला प्रश्न नाही . हा आपल्या संपूर्ण देशाच्या चारित्र्याचा प्रश्न आहे . विदेशी पर्यटकांना येणारा काहीवेळा अनुभव हा याच मालिकेतील कडी आहे . याला पायबन्द जसाकायद्याने बसेल , तसाच आणि तितकाच आपल्या सगळ्यांच्याच सततच्या सतर्कतेतून बसेल . अशीच संवेदनशीलता काश्मिर बाबतही हवी हे ओघानेच आले .

हा प्रश्न जसा सामाजिक आहे आणि असतो ; तसाच आणि तितकाच आर्थिक , राजकीय ही असतो हे लक्षात घेतले कि त्याची आपल्या गुंतवणूकीच्या धोरणाबाबतीत असणारी समर्पकता वेगळी सांगण्याची आवश्यकता उरत नाही .

अशा अनेक अर्थांनी , अनेक क्षेत्रात , अनेकदा . . . .

No MEANS No .

— चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ, राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१ .
मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
E-Mail . . . tilakc@nsdl.co.in

२३ सप्टेंबर २०१६

( गुंतवणूक तुमची माझी ;  भाग तेरावा ) 

चंद्रशेखर टिळक
About चंद्रशेखर टिळक 25 Articles
श्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..