नवीन लेखन...

मुक्ताफळें

 

होत चालणे सरळ मार्गीं, जगींच्या वाकप्या मार्गांवरी ।
चालतांना मार्गीं, ना दिले लक्ष, जनांच्या बेरक्या नजरांवरी ।।
देऊनि बगल, तिरकस विचारांना, टाळले तयां वरचेवरी ।
राहूनि निरलसपणे, लाभली मज, सुखी जीवनाची लॉटरी ।।
लाभली मज, सुखी जीवनाची लॉटरी ।।१।।

साधेपणाने देखूनि अमुचा, ठरविले तयांनी आम्हां सांब भोळा ।
घेतले ऐकूनि सारे, नाही केले, मनीं तयांचे, ते विचार गोळा ।।
शांत चित्ते, पटले मनांस, तयांच्या मते, जरी ठरलो खुळा ।
राज हंसापरी, आहे तेवीत मी, या सौख्य सागराच्या गोरसा ।।
या सौख्य सागराच्या गोरसा ।।२।।

नव्या युगाची, नव संकल्पनांची, आहे नांदी कॉम्प्युटर ।
नवनव्याचा ध्यास, अमुच्या उरीं, फुरफुरतो अपार ।।
करण्या अंगीकार सुधारणांचा, आहोत सदा, आम्ही तत्पर ।
हळूच भार्या म्हणे, द्या, आतांतरी, मुलांना संधी थोडी फार ।।
द्या, आतांतरी, मुलांना संधी थोडी फार ।।३।।

ऐकून घेतले नित्याप्रमाणे तिचे, वृत्तीत बदल माझ्या केला ।
सांधा जरी बदलला, स्वभावांत माझ्या, फरक फारसा न पडला ।।
जाणूनि होतो सत्य, चालवूनि डोके अपुले, भार्ये आज्ञेच वागणे ।
मर्म सुखी जीवनाचे, खाऊनि ठोकरा अनेक, जरा उशिराच उमगले ।।
खाऊनि ठोकरा अनेक, जरा उशिराच उमगले ।।४।।

साथीस असतां घरचीच बाईल, धरिला न हातीं मोबाईल ।
बायडीच असतां, जवळी फीमेल, बाळगलान आयडी ई-मेल ।।
जरी नव्हते क्रेडिट, तसे नव्हते डएबीटही, भासली न गरज कार्डाची ।
आहे सदैव कृपा मजवरी, मझ्याच, प्रिय माऊली गाडीची ।।
मझ्याच, प्रिय माऊली गाडीची ।।५।।

वाचाळपणांतुनि अमुच्या, होत होती अमुची कुचंबणा ।
न वाटला खेद कधी, नाही वाटला तयाचा जराही अचंबा ।।
राहूनि सरल, साध्या विचारांत, जोपासले मस्तीत माझ्याच छंद ।
कृपेने माऊलीच्या, आला भरुनि स्वनंदे, हा जीवनाचा तुंबा ।।
आला भरुनि स्वनंदे, हा जीवनाचा तुंबा ।।६।।

होते बोलणे तसे स्पष्ट, येतातबोलते, हृदयांतुनि झाले ।
वाटले तयांना, परखडपणांतुनि, आगोत आम्ही विकृत मनाचे ।।
अद्वा तद्वा घेतले बोलून, न उरले भान तयां कशाचे ।
न घेतले कधी मनां, ते बोल होते, सारे तयांच्याच मनाचे ।।
ते बोल होते, सारे तयांच्याच मनाचे ।।७।।

नवनव्याच्या ध्यासापायीं, उडविली तयांनी आमुची खिल्ली ।
नाही डगमगलो कधीही, जगलो निर्भयतेने, होऊनि एक वल्ली ।।
निरागस अमुच्या वृत्तीची, उडवली सदा तयांनी टर ।
असतां नामांत, प्रसन्न चित्ते, नाही बिघडले अमुचे खेटर ।।
जगी नाही बिघडले अमुचे खेटर ।।८।।

वागण्यांतुनि, आहोत सदा, मिष्किल नि अवखळ ।
वाटला कैकांना, आहे उतारवयांतला, अमुचा पोरखेळ ।।
भावुकता मनांत होती सुप्त, जागृत बोलणे जरी फटकळ ।
निर्मल अंतराची होती, निखळ निरामय, ती खळखळ ।।
निखळ निरामय, ती खळखळ ।।९।।

साधेपणा, कपड्यांतुनि ज्ञात होता जगाला ।
दुर्लक्षितां, जनांच्या पुटपुण्याला, लाभली शांती मनमनाला ।।
ध्यान देतां वसनांवरीं, द्यावी न तिलांजली आत्मीयतेला ।
खंत नसावी उपेक्षांची, देतां आधार, सत् संकल्पनेला ।।
देतां आधार, सत् संकल्पनेला ।।१०।।

तिजवाटे, कुठे काय बोलावे, हे कळत नाही मजसी ।
अन्
मज वाटे कुठे काय बोलू नये, हे कळत नाही तिजसी ।।
खळाळली जीवन गाथा, शब्दांच्या अशा या घोळांपायीं ।
सानंदे साधले सारे, सदा घेऊनि लीन, गुरुमाऊलीपायीं ।।
सदा घेऊनि लीन, गुरुमाऊलीपायीं ।।११।।

गुरुदास / सुरेश नाईक
१० फेब्रुवारी २०११, गुरुवारराधा-निवास
मुलुंड (पू) मुंबई ४०००८१

“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..