नवीन लेखन...

तोंडाच्या स्वच्छतेसाठी माउथवॉश

बराच वेळ तोंड बंद असेल, जसे प्रवासात किंवा सतत काहीतरी खाण्याची सवय असेल तर तोंडातील जिवाणूंची संख्या वाढते आणि तोंडाला दुर्गंधी येते. पाणी कमी पिणे, दातांच्या हिरड्यांचा समस्या, जंतूसंसर्ग अशा अनेक कारणांमुळे तोंडाला दुर्गंधी शकते. अशा येऊ व्यक्तींबरोबर संवाद साधताना ही समस्या जास्त भेडसावते. मौखिक आरोग्य चांगले राहण्यासाठी, मुख्यतः तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी माउथवॉशचा उपयोग केला जातो. टूथपेस्ट आणि माउथवॉशमध्ये असणारी रसायने वेगवेगळी असतात. काही रसायने दोन्ही उत्पादनांत आढळतात. माउथवॉश चूळ भरण्यासाठी वापरली जातात, ज्यामुळे तोंडातील जिवाणू नाहीसे होतात. तोंडातील जिवाणूंमुळे तोंडाला दुर्गंधी येते. श्वासाला उत्साहवर्धक ताजेपणा येण्यासाठी मिंटसारखे फ्लेवर (स्वाद) माउथवॉशमध्ये वापरले जातात.

माउथवॉशमध्ये अल्कोहोल, क्लोरहेक्झाडाईन ग्लुकोनेट, थायमॉल, सिटाईलपायरीडिनियम क्लोराईड, हेक्झेटिडीन, ट्रायक्लोसन यांतील काही जिवाणूनाशक रसायने वापरलेली असतात. काही माउथवॉशमध्ये फ्लोराईड वापरलेले असते. जिवाणूरोधक रसायनांव्यतिरिक्त स्वाद आणि सुगंधासाठी युकॅलेप्टल, मेंथॉल, मिथाईल सॅलिसिलेट यांचा वापर केला जातो आणि माउथवॉशमधील गोडवा सोडिअम सॅकरीन या रसायनामुळे येतो. माउथवॉशमध्ये जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून प्रिझरव्हेटिव्हचा वापर केला जातो. सोडियम बेंझोएट हे रसायन प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून वापरतात.

तोंडाची स्वच्छता आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी गुळणी करून स्वच्छता करणे ही पद्धत पूर्वीपासून प्रचलित आहे. हिरड्या फुटण्यावर, हिरड्या आकुंचन करण्यासाठी तुरटीच्या गुळण्या करीत असत. तुरटी म्हणजे अॅल्युमिनियम सल्फेट. माउथवॉशमधील रसायने जंतूनाशकाचे कार्य करतात, हिरड्यांना सूज येणे, हिरड्यांमध्ये वेदना होणे यासाठी उपाय म्हणून माउथवॉशचा वापर उपयोगी ठरतो. माउथवॉशने दातात अडकलेले अन्नपदार्थाचे कण काही प्रमाणात निघू शकतात, पण टूथपेस्टच्या साहाय्याने टूथब्रशने दातात अडकलेले अन्नपदार्थांचे कण चांगल्या प्रकारे निघतात.

ताज्या श्वासासाठी माउथवॉश वापरायला काहीच हरकत नाही. मौखिक आरोग्य चांगले राहिले तर दातांच्या समस्या उद्भवणार नाहीत. माउथवॉश वापरलात तरी टूथब्रश वापरून टूथपेस्टने दातांची चांगली स्वच्छता करणे आवश्यकच आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..