नवीन लेखन...

मी प्रेमभाव जागवला

माझ्यातला चांगुलपणा
मी पुन्हा जागवला
प्रेमभाव अंतरीचा
पुन्हा मी जोपासला
मनातली वैरभावना ती
कशी कावरी-बावरी झाली
प्रेमाच्या सानिध्यात
फार काळ नाही टिकली
खूनशी वृत्ती ती
मन पोखरत राहीली
चांगुलपणाला घाबरून
प्रेमाला शरण आली
तिरस्काराचे ते पेटते बाण
होते जरी सुटलेले
आपुलकीच्या ओलाव्याने
आपसुकच ते विझलेले
रोषानेही मग आपला
रस्ता तेंव्हा बदलला
द्वेषालाही अस्तित्वाचा
जणु उबग आला
स्वार्थाला स्वतःचीच
लाज वाटू लागली
मानवतेची ओळख मनाला
नव्याने पटू लागली
अहंकारानेही आपली
मान खाली घातली
सुंदरता माझ्या मनाची
तेव्हा मला दिसली
तुटलेले दूखावलेले
जवळ आले ते सारे
जिवन जगण्याचे सूत्र
सापडले मला ते खरे.

– डॉ. सुभाष कटकदौंड

 

डॉ. सुभाष कटकदौंड
About डॉ. सुभाष कटकदौंड 25 Articles
डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. "भिंतींना ही कान नाहीत" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..