नवीन लेखन...

मम-ताई

 

वळणा मागुनि राजस वळणे टाकित मागे,
भाव-फुलांचे सडे पसरुनि मार्गावरी,
प्रेमांत वेगळ्या अन् धुंदीत आगळ्या,
कधी न कळले, आलीस केव्हां, एकसष्ठीच्या वळणावरती ।
अगं ताई, आलीस केव्हां, एकसष्ठीच्या वळणावरती ।।धृ।।

किती करावे अन् काय करावे, उत्साहाला उधाण आले ।
अंतरीच्या तव, ओलाव्यांतुनि, सारे तुजला, सारे जमले ।।
नित वाहुनि चिंता भावंडांची, तव जन्माचे सार्थक केले ।
अथक दंग राहुनि, साठी अमुच्या, तूं, अवघे आयु वेंचले ।।
कधी न कळले, कसे वाढलो, अंतरीच्या अपार स्नेहावरती ।।१।।

नित्य नवा ध्यास उरीं, जिवापाड आम्हास जपण्याचा ।
जगावेगळा छंद आगळा, हौसेस अमुच्या दाद देण्याचा ।।
जिद्दी परी हट्टी मोठअ, नूतन सारे आम्हांस देण्याचा ।
आभेत प्रभेच्या, होता विश्वास दृढ अमुच्या कल्याणाचा ।।
माये पाठी, माय होऊनि, आम्ही वाढलो, तव ममते वरती ।।२।।

वात्सल्याच्या उर्मीपोटी, झालीस तूं माय आमुची ।
सुरेल अमुच्या मार्गांसाठी, केलीस तूं, होळी स्वार्थाची ।।
प्रेमे घेऊनि अंकी, पदराखाली, केलीस पखरण प्रीतीची ।
स्तन बाळांपरी जपले, मऊ होऊनी, साय दुधावरची ।।
नत-मस्तक सदैव आम्ही, प्रेम-स्वरुप तव मूर्ती पुढती ।।३।।

-गुरुदास / सुरेश नाईक
२ सप्टेंबर २००७
मुलुंड (पूर्व), मुंबई ४०००८१

— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..