नवीन लेखन...

मेक बिलीव्ह – बरंच भ्रामक, किंचित खरं !

चित्रपटाच्या पांढऱ्या पडद्यावर दिसणारे सगळे खरे आणि म्हणून भावनांना अपील करणारे असते या वयातून मी गेलोय.

” समाज को बदल डालो ” नामक जेमिनीपट भुसावळच्या पांडुरंग टॉकीज मध्ये लागला होता, त्याच्या टायटलने मी थरारून गेलो होतो. समाजाला बदलून टाकण्याची असोशी माझ्यात तेव्हा का होती, कल्पना नाही. आणि रफीच्या आवाजातील ” समाज को बदल डालो ” हे गाणं रेडिओ वर लागलं की मस्त मुठी वगैरे वळायच्या. आता हसू येतं. सुदैवाने(?) हा चित्रपट मी बघितला नाही.

खामगावला “नया जमाना ” बघितला- धर्मेंद्र -हेमावाला !
“कितने दिन आँखे यू तरसेंगी ” वर आशेचे हिंदोळे सुरु करत ” नया जमाना आयेगा ” म्हणत लता उद्याचं चित्र दाखवत होती. तसं अजूनही काही झालं नाही.

” सांस भी कभी बहू थी ” हाही असाच नावावरून फसवा चित्रपट असावा. मी बघितला नाही पण गल्लीत चालणाऱ्या सासू-सुनांच्या भांडणांवर यात काही खरमरीत उतारा असावा असं खूप वाटून गेलं. पुन्हा ओम फस्स ! अजूनही सासू-सुनांमधून आडवा विस्तव जात नाही.
“रोटी कपडा और मकान ” सारखे सामाजिक नांव देऊन मनोजरावांनी स्वतःची “रोटी ” भाजून घेतली तेव्हा आम्ही नुकतीच पौगंडावस्था ओलांडली होती , पण फसणे तेच !

माझा मित्र म्हणाला होता- ” अरे, एकच प्याला जुनं झालं पण कोणी दारू पिणं सोडलं का?”

सगळंच मेक बिलिव्ह!

पण साहिर “बर्निंग ट्रेन ” मध्ये सांगून गेला –
” अपना तो ये इमान हैं
जो भी जितना साथ दे, एहसान हैं ! ”
तेव्हा डोळ्यांसमोर भक्क जाळ उमटून गेला.

आणि काल सकाळचं ” ललकार ” मधलं –

” आज गालो मुस्कुरालो , मैफिले सजालो
ना जाने कल कोई साथी छूट जाये
जीवन की डोर बडी कमजोर !! ”

गेल्या महिन्याभरात या ओळी दोन-तीनदा खऱ्या ठरल्या आहेत.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..