नवीन लेखन...

‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : विभाग – ३ – ब

साहित्यिक ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषावैविध्य  व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….


 

विभाग

  • तुकाराम :

तुकारामांनी वापरलेला काव्यप्रकार म्हणजे मुख्यत: अभंग. तसेंच, त्यांना एकाच तर्‍हेचा ऑडियन्स् अपेक्षित आहे. त्यामुळे, त्यांच्या भाषेची स्टाइल् (शैली) अपेरंटली सारखीच दिसते. तरीही, कांहीं फरक आढळतात.

  • ही भाषा पहा –
  • ‘फोडिलें भांडार । धन्याचा हा माल ।

मी तंव हमाल । भारवाही ।।

  • एक पाहतसां एकाची दहनें ।

कां रे त्या गुणें सावध न व्हां ?

  • घोंटवीन ज्ञान । ब्रह्मज्ञान्याहातीं ।

मुक्ता आत्मस्थिती । सांडवीन ।।

  • तुका म्हणे होय । मनासी संवाद ।

आपुलाचि वाद । आपणांसी ।।

  • सोनियाचें ताट । क्षीरीनें भरिलें ।

भक्षावया दिलें  । श्वानालागीं ।।

  • हेच तुकाराम रोखठोक, अश्लील, ग्राम्य वाटेल अशी भाषा वापरायलाही कचरत नाहींत.
  • परपुरुषाचे सुख । भोगे तरी ।

उतरोनि करीं । घ्यावें सीस ।।

इथें, पारमार्थिक रूपक वापरतांनाही ‘विवाहबाह्य शारीरिक संबंधा’बद्दलचा दृष्टान्त तुकारामांनी वापरलेला आहे.

*(२० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळच्या, पुण्याच्या, अश्लीलतेविरुद्ध ओरडा करणार्‍या ‘मार्तंडांना’ असा उल्लेख खचितच पटला नसता ! ज्या ‘मार्तंडां’नी माधव ज्यूलियन यांच्या प्रेमकवितांविरुद्ध रान उठवले, त्यांनी तुकारामांच्या अशा काव्याचें काय केलें असतें ? खालील अभंग तर त्यांनी खचितच पुन्हां इंद्रायणीत बुडवले असते ! ).

 

 

  • शृंगारिलें मढें । जीवेवीण जैसे कुडें ।।

आपल्या अभंगात ‘मढें’ हा तद्दन ‘colloquial’ व ग्राम्य शब्द वापरायला तुकारामांना आक्षेपार्ह असें कांहीं वाटलें नाहीं.

  • तुका म्हणे रांड । न करितां विचार ।

वाहुनिया भार । कुंथे माथा ।।

‘रांड’ हा शब्दही असाच आहे. तो बोलीभाषेत सहज वापरला जात असला, शिवी म्हणूनही वापरात असला, तरी त्याचा वापर करण्यांस तुकाराम कचरले नाहींत.

  • भले तरी देऊं । गांडीची लंगोटी ।

नाठाळाचे काठी । हाणूं माथा ।।

*हा अभंग जेव्हां शालेय पुस्तकात घालायचें ठरवलें, तेव्हां आचार्य अत्रेंसारख्या ‘भन्नाट’ माणसानेंही काय केलें ?  ( त्यांच्या भन्नाटपणाबद्दल, त्यांचा लेख : ‘आम्हीही फार चावट होतो’ वाचावा. त्यांच्या भाषणातील ‘जें तुमच्या मनांत आहे, तें माझ्या हातात नाहीं’ हें वाक्यही प्रसिद्ध आहे. त्यांतून अत्रे यांच्या श्लीलाश्लीलतेबद्दलच्या नव-विचारांची कांहींशी कल्पना येते). हेच अत्रे तुकारामांचा हा अभंग शालेय पुस्तकात घालतांना बिचकले, त्यांनी शब्दात बदल केला, आणि ‘भले तरी देऊं कासेची लंगोटी’ अशी ओळ दिली. मात्र, तुकारामांना, आपण वापलेल्या शब्दात कांहीही अश्लील किंवा क्रूड वाटलें नाहीं, तर, तो शब्द वापरणें त्यांना योग्यच वाटलें.

  • म्हणजेच, आवश्यतेनुसार तुकारामांनी उच्चप्रतीचे शब्द व विचारही वापरले, आणि अन्यत्र ग्राम्य, अश्लील वाटणारे शब्दही वापरले. हा फरक ध्यानात घ्यावा.

 

– सुभाष स. नाईक     
Subhash S. Naik

M – 9869002126 .   
eMail : vistainfin@yahoo.co.in

– – –

LATTERATEUR  DNYANESHWAR  AND  LINGUAL-VARIETY – Part –  3-b

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..