नवीन लेखन...

कधी कधी थकत जातं मन

कधी कधी थकत जातं मन
विचारांच्या अगणित काहूरात
तरीही उरतात अनेक प्रश्न सारे
अर्धवट अनाकलनीय गूढ आवर्तनात
मनाला क्षीण होतो हलकासा
आणि विखुरतात आवेगांचे वारु
पडझड होते अनंत कथांची
उरतात मागे वेदनांचे तेच वारु
खोल तळाचा गाभा अंधारुन जातो
उध्वस्त मनात काट्याचा घाव बोचतो
तरीही राहतात अनेक प्रश्न अनुत्तरित काही
उत्तरांची काजळ रेघ निसटते त्या घनगंभीर रात्री
मन हरवत की हरकत कळत नाही
आईच्या शब्दांची मात्रा अल्लड वयात उलगडत नाही
उशीर होतो वेळ निसटून अलगद जाते
या मनाचे त्या मनाला उलगडत नसते
पैलतीरी संध्या अवचित आयुष्यात येते
सांज दिवा लावतांना वेळ सरत जाते
नको होतात साठवणी हरवून जाणाऱ्या
आयुष्यात येणाऱ्या चिंता जातात वाढणाऱ्या
मनःशांती ढळत जाते अलगद काळ डोहात
दूर हरवतात वाटा आल्हाद पाचोळ्यात
रडवून जाते वेळ कातर संध्या धूसर होते
आईच्या आठवणीत मग नयन पैल लागते
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..