नवीन लेखन...

‘कभी कभी’… असंच कधीतरी, काहीबाही !

सोलापूरच्या उमा चित्रगृहाच्या बाहेर भलं थोरलं पोस्टर ! “जंजीर ” आणि “दिवार ” मधील अंगार ओकणारा अमिताभ वेगळ्याच वेशभूषेत ! त्याने घातले होते, त्याला ” पॉलीनेक ” म्हणतात हे कालांतराने वालचंदला असताना समजले. हिंदी चित्रपटसृष्टीतील यच्चयावत “हूज हू ” मंडळी एका पडद्यावर !

सुरुवात शांत,रोमँटिक अमिताभच्या दर्शनाने- चक्क कविता करताना आणि गुणगुणताना ! लगेच महाविद्यालयात ” मैं पल दो पल का शायर हूँ ” असं क्षणिक तात्पुरतं कवी जीवन स्वीकारणारा ! हे सगळंच विलोभनीय आणि गुरफटून टाकणारं मायाजाल. याही रूपात तो आवडला- विरही /उत्कट प्रेमी, नंतरचा ” मी कविता करणं सोडलंय, तो शायर कधीच मेलाय ” म्हणणारा कडवट व्यावसायिक. या माणसाच्या हाताला अदृश्य परीस चिकटलाय – हात लावील त्या भूमिकेचं सोनं, निव्वळ सोनं (अगदी अलीकडच्या “पा “, “ब्लॅक “, ” सरकार ” पर्यंत ! ) त्याची रेंजच कोड्यात टाकणारी – विस्मयकारी !

सोबतीला शशी कपूरचं जिंदादिल प्रेम आणि शेवटी ऋषी-नीतू जोडीचं अवखळ/धसमुसळं प्रेम ! सगळ्या रोमान्स छटा एकाच वेळी अनुभवल्या. अशा चौकटीबाहेरचे ” कस्मे वादे ” आणि “सिलसिला ” हे अमिताभचे त्यानंतरचे चित्राविष्कार ! पण तोपर्यंत या डोमेन मध्ये (ही )अमिताभ फिट्ट बसला.

” मैं हर एक पलका शायर हूँ ” वाल्या सच्च्या साहीरला खय्याम ने सुरेल कोंदण दिले. काश्मीरची नयनरम्य पार्श्वभूमी कथेला नजाकत देऊन गेली.

असाच काहीतरी विचार आज मनात आला- ही कलावंत मंडळी निवांतवेळी मागे वळून नक्कीच बघत असणार. त्यांना काय “जुनं ” आठवत असेल? आज नीतू सिंग ला “कभी कभी ” चा तो “थ्रो बॅक” ऋषी आठवत असेल? अमिताभला सध्या एकांतवासात असलेली धूसर पुसट राखी ( त्याच्या कवितांची दिवानी) आठवत असेल? देवाघरी गेलेला शशी कपूर सिमी गरेवाल ला आठवत असेल कां ? आत्ता आत्ता निवर्तलेल्या खय्यामला या चित्रपटानंतर लगेचच निधन पावलेला साहीर कितीवेळा शब्दांसकट स्मरला असेल ?

उमा चित्रगृहाच्या पडद्याला या कलाकारांच्या काही आठवणी असतील? तेथील भिंतींवर आदळलेली सुरावट, संवाद, पार्श्वसंगीत वेगळं करून सांगता येईल?

युंही – ” कभी कभी मेरे दिलमे खयाल आता हैं !”

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..