नवीन लेखन...

जीना यहाँ, मरना यहाँ !

राज कपूर साठी रचलेल्या या गीतपंक्ती दोनदा खऱ्या ठरल्या – १९८७ साली त्याच्या मृत्यूच्यावेळी आणि आता २०१९ मध्ये त्याने निर्मिलेली हिंदी चित्रसंस्कृतीची वास्तू ” आर के स्टुडीओ “अस्तंगत होत असताना ! हे गीतकाराचे द्रष्टेपण म्हणायचे कां ? येणाऱ्या काळाची चाहूल इतकी आधी लागू शकते कां ? कदाचित हे चिरंतन सत्य काहींना आधीच कळत असावे.

राज कपूरला मी “तरुण भारत ‘मधल्या मृत्युलेखात “निळ्या डोळ्यांचा जादूगार “असे संबोधले होते. या गृहस्थाने स्वप्न बघायला शिकवले. पांढऱ्या पडदयावर प्रेम करणाऱ्या आमच्या डोळ्यांत मावणार नाहीत अशी स्वप्ने त्याने पेरली. या स्वप्ननिर्मितीला पूरक असा कारखाना त्याने “आर के स्टुडिओ ” या नांवाने सुरु केला. सहसा असे धाडस कलावंत करत नाहीत. पण हा कलावंत काही वेगळाच होता – निर्माता ,दिग्दर्शक ,संगीतात अभिरुची आणि चित्रफ्रेमचे अचूक ज्ञान असलेला !

त्याच्या कलाकृतींचा साक्षीदार असलेला हा वारसा आता काळाच्या पडद्याआड जायला निघालाय. त्याच्याबरोबर असंख्य स्वप्नेही मातीत मिसळणार आहेत.

राज कपूरच्या (कर्तृत्ववान?) पिढीला हे जोपासावे कां वाटले नाही ? वडिलांची (काही ) स्वप्ने मुलांची होउ शकत नाही कां ? प्रत्येकवेळी ” आमचे डोळे ,आमची स्वप्ने ” असेच असायला हवे कां ? मायबाप सरकारलाही हें काळाचे प्रतिबिंब जपण्यासाठी काही करावेसे वाटले नाही कां ? दरवेळी साक्षीदार उध्वस्त कां करायचे ? एखादया कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपनीला पुढे येउन “CSR” चा हात द्यावासा का वाटला नाही ? चित्रसृष्टीतील कलावंत या वास्तूच्या संरक्षणासाठी कां पुढे आले नाहीत ?

ही भग्न वास्तू आता गाशा गुंडाळणार आणि तिच्या जागी एखादी टोलेजंग इमारत गोदरेज बांधणार !

१९८२ साली हेम्या RCF ला गेला आणि पहिल्यांदा मी हा स्टुडिओ जवळून पाहिला. त्यानंतर अनेकदा मुंबईला जाता -येताना भक्तिभावाने चेंबूर आले की आरके च्या लोगोकडे लक्ष जायचे. आतमध्ये आठवणींची पडझड व्हायची , वरकरणी सगळे ठाकठीक ! देवनार आणि चेम्बूरवर आरकेने आपली नाममुद्रा उठवली होती. आता ती फक्त माझ्या आत राहणार ! स्वप्नांच्या सौदागराची कर्मभूमी नामशेष होणार. आपणही ही पडझड वेळीच आवरायला हवी, इतरांनी पाडण्याआधी !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..