नवीन लेखन...

जगलो कसा किती?

जगी मी जगलो कसा कळले नाही
पण भोगले ते कधी विसरलो नाही

आज मनहृदयी घोंगावती गतस्मृती
स्पर्श वात्सल्यामृताचा भुललो नाही

मी भाग्यवंत!कृपावंत प्रीतीत डुंबलो
तो सहवास लाघवी विसरलोच नाही

भोगले सुखाने, मी भाळीचे दैवदान
दोष! कधीही कुणाला दिलाच नाही

लाभले त्याचा सार्थ अभिमान आहे
दुर्लभतेची, खंत कधीच केली नाही

सुख, दुःख, वेदनां नित्य संगतीला
हताश होऊनी मी कधी हरलो नाही

त्या कृपाळू, दयाघनाची साथ आहे
भयभीत! मी कधीही झालोच नाही

जन्ममृत्यू! अटळ कालचक्र सृष्टीचे
त्यातुनी जगी कुणाचीच सुटका नाही

जगणेही सुंदर! त्याहूनही मृत्यू सुंदर
साशंक, मी मनी कधी झालोच नाही

— वि.ग.सातपुते.(भावकवी)

9766544908

रचना क्र.१३९

२८ – १० – २०२१

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..